शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

विद्यापीठात रात्री दहा वाजेपर्यंत चालले पदव्यांचे वाटप; जिल्हा परिषद भरतीचे परिणाम

By राम शिनगारे | Updated: September 13, 2023 20:37 IST

दहा ते पंधरा वर्षांपासूनच्या पदव्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या 'रात्री खेळ चाले' अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यापीठात मागील आठवड्यापासून पदव्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या आहेत. मागील दहा जे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्यांची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षक भरती कारणीभूत ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्यांची आठवण झाली. त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पदव्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी इमारतीच्या बाहेरच स्टॉल लावले आहेत. तसेच त्याचठिकाणी विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचा अर्ज स्विकारला जात आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप आणि अर्जांची स्विकृती करण्यात येत होती.

तसेच बुधवारी सकाळीच आठ वाजता पदवी प्रमाणपत्राच्या कामाला सुरूवात झाली. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हे स्टॉल लावलेल्या ठिकाणी काम संपेपर्यंत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री उशिारार्यंत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. योगिता होके पाटील या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आल्या. विद्यार्थी पदवीसाठी अर्ज केल्यानंतर तासाभरातच प्रमाणपत्राची अपेक्षा करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे तर गुणपत्रिका नाहीत. त्याशिवाय पदव्यांची मागणी करीत आहेत. विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारीही मदतीसाठी धावले आहेत.

पाच दिवसात अडीच हजार पदव्यामागील पाच दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार पदव्यांचे वाटप परीक्षा विभागाने केले आहे. प्रतिदिनी चारशेपेक्षा अधिक अर्ज दाखल होत आहेत. जि.प. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ प्रतिदिनी १० ते १२ अर्ज पदवी प्रमाणपत्रासाठी येत हाेते. आता हा आकडा ४०० पटीने वाढला आहे.

विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदतविद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र घेऊन गेले पाहिजे. पदवी प्रमाणपत्र जसा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तसेच हे प्रमाणपत्र वेळेच्या आत घेऊन जाण्याचे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळीच कर्तव्य पूर्ण केले असते तर विद्यापीठ प्रशासनावर अधिकचा ताण आला नसता. तरीही प्रशासन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करीत आहे.-डॉ.श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण