शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

विद्यापीठात रात्री दहा वाजेपर्यंत चालले पदव्यांचे वाटप; जिल्हा परिषद भरतीचे परिणाम

By राम शिनगारे | Updated: September 13, 2023 20:37 IST

दहा ते पंधरा वर्षांपासूनच्या पदव्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या 'रात्री खेळ चाले' अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यापीठात मागील आठवड्यापासून पदव्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या आहेत. मागील दहा जे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्यांची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षक भरती कारणीभूत ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्यांची आठवण झाली. त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पदव्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी इमारतीच्या बाहेरच स्टॉल लावले आहेत. तसेच त्याचठिकाणी विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचा अर्ज स्विकारला जात आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप आणि अर्जांची स्विकृती करण्यात येत होती.

तसेच बुधवारी सकाळीच आठ वाजता पदवी प्रमाणपत्राच्या कामाला सुरूवात झाली. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हे स्टॉल लावलेल्या ठिकाणी काम संपेपर्यंत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री उशिारार्यंत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. योगिता होके पाटील या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आल्या. विद्यार्थी पदवीसाठी अर्ज केल्यानंतर तासाभरातच प्रमाणपत्राची अपेक्षा करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे तर गुणपत्रिका नाहीत. त्याशिवाय पदव्यांची मागणी करीत आहेत. विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारीही मदतीसाठी धावले आहेत.

पाच दिवसात अडीच हजार पदव्यामागील पाच दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार पदव्यांचे वाटप परीक्षा विभागाने केले आहे. प्रतिदिनी चारशेपेक्षा अधिक अर्ज दाखल होत आहेत. जि.प. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ प्रतिदिनी १० ते १२ अर्ज पदवी प्रमाणपत्रासाठी येत हाेते. आता हा आकडा ४०० पटीने वाढला आहे.

विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदतविद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र घेऊन गेले पाहिजे. पदवी प्रमाणपत्र जसा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तसेच हे प्रमाणपत्र वेळेच्या आत घेऊन जाण्याचे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळीच कर्तव्य पूर्ण केले असते तर विद्यापीठ प्रशासनावर अधिकचा ताण आला नसता. तरीही प्रशासन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करीत आहे.-डॉ.श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण