शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

विद्यापीठात रात्री दहा वाजेपर्यंत चालले पदव्यांचे वाटप; जिल्हा परिषद भरतीचे परिणाम

By राम शिनगारे | Updated: September 13, 2023 20:37 IST

दहा ते पंधरा वर्षांपासूनच्या पदव्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या 'रात्री खेळ चाले' अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यापीठात मागील आठवड्यापासून पदव्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या आहेत. मागील दहा जे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्यांची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षक भरती कारणीभूत ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्यांची आठवण झाली. त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पदव्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी इमारतीच्या बाहेरच स्टॉल लावले आहेत. तसेच त्याचठिकाणी विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचा अर्ज स्विकारला जात आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप आणि अर्जांची स्विकृती करण्यात येत होती.

तसेच बुधवारी सकाळीच आठ वाजता पदवी प्रमाणपत्राच्या कामाला सुरूवात झाली. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हे स्टॉल लावलेल्या ठिकाणी काम संपेपर्यंत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री उशिारार्यंत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. योगिता होके पाटील या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आल्या. विद्यार्थी पदवीसाठी अर्ज केल्यानंतर तासाभरातच प्रमाणपत्राची अपेक्षा करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे तर गुणपत्रिका नाहीत. त्याशिवाय पदव्यांची मागणी करीत आहेत. विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारीही मदतीसाठी धावले आहेत.

पाच दिवसात अडीच हजार पदव्यामागील पाच दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार पदव्यांचे वाटप परीक्षा विभागाने केले आहे. प्रतिदिनी चारशेपेक्षा अधिक अर्ज दाखल होत आहेत. जि.प. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ प्रतिदिनी १० ते १२ अर्ज पदवी प्रमाणपत्रासाठी येत हाेते. आता हा आकडा ४०० पटीने वाढला आहे.

विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदतविद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र घेऊन गेले पाहिजे. पदवी प्रमाणपत्र जसा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तसेच हे प्रमाणपत्र वेळेच्या आत घेऊन जाण्याचे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळीच कर्तव्य पूर्ण केले असते तर विद्यापीठ प्रशासनावर अधिकचा ताण आला नसता. तरीही प्रशासन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करीत आहे.-डॉ.श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण