शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दहावी - बारावीची ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कमी होतो आहे, म्हणता म्हणता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. पाचवीपासून पुढच्या इयत्तांच्या सुरू ...

औरंगाबाद : कमी होतो आहे, म्हणता म्हणता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. पाचवीपासून पुढच्या इयत्तांच्या सुरू झालेल्या शाळाही बंद करण्याची वेळ आली. असे असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील काही शहरांची परिस्थिती चिंताजनक असून, तेथे काही दिवसांसाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अशा वातावरणात मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक वाटत असले तरी,

परीक्षा सुरू होईपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.

दहावी - बारावी या मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वळणावर कोरोनाचे जागतिक संकट ओढवल्याने पालक आधीच चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेतच. फक्त सगळे पेपर विद्यार्थ्यांना सुखरूप देता यावेत, परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशी प्रत्येक पालकाला काळजी वाटते आहे.

चौकट :

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची परीक्षा- २९ एप्रिल ते २० मे

बारावीची परीक्षा- २३ एप्रिल ते २१ मे

प्रतिकिया दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

१. सध्या पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक मुलांच्या परीक्षांपर्यंत कमी होईल, अशी आशा आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजेत. फक्त सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जावी, हीच अपेक्षा आहे. याउलट विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला होम सेंटर देऊन आपापल्या शाळेतच परीक्षा देण्याची संधी मिळाली तर चांगले होईल.

- पल्लवी मालाणी

२. माझे पाल्य जर आता १० वी मध्ये नसते, तर अशा परिस्थितीत आम्ही यावर्षीची परीक्षा कधीच गांभीर्याने घेतली नसती. पण आता १० वीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने आमचाही नाईलाज आहे. मुलांनी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जाणे गरजेचेच आहे. कारण दहावी व बारावीसारख्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या तर मुलांना आणि पालकांनाही त्याचे गांभीर्य राहणार नाही. त्यामुळे योग्य काळजी घेऊन परीक्षा घ्याव्यात.

- अमोल जगताप

प्रतिक्रिया

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

१. जेईई तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी आता विद्यार्थ्यांना सेंटरवर जावेच लागत आहे. त्यामुळे आता जशी काळजी घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना सेंटरवर पाठवत आहोत, तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठीही पाठवू. काळजी तर खूप वाटते, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने पर्याय नाही.

- मंजुषा चौधरी

२. परीक्षेची वेळ येईपर्यंत कोरोना कमी होईल, अशी आशा वाटते. परिस्थिती याच्या उलटही होऊ शकते. जर त्या वेळी रुग्ण वाढत गेले, तर शासनाला विद्यार्थ्यांना उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन त्यांचा निर्णय बदलावा लागू शकताे.

- तृप्ती पाटील