शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

दहावी - बारावीची ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कमी होतो आहे, म्हणता म्हणता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. पाचवीपासून पुढच्या इयत्तांच्या सुरू ...

औरंगाबाद : कमी होतो आहे, म्हणता म्हणता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. पाचवीपासून पुढच्या इयत्तांच्या सुरू झालेल्या शाळाही बंद करण्याची वेळ आली. असे असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील काही शहरांची परिस्थिती चिंताजनक असून, तेथे काही दिवसांसाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अशा वातावरणात मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक वाटत असले तरी,

परीक्षा सुरू होईपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.

दहावी - बारावी या मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वळणावर कोरोनाचे जागतिक संकट ओढवल्याने पालक आधीच चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेतच. फक्त सगळे पेपर विद्यार्थ्यांना सुखरूप देता यावेत, परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशी प्रत्येक पालकाला काळजी वाटते आहे.

चौकट :

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची परीक्षा- २९ एप्रिल ते २० मे

बारावीची परीक्षा- २३ एप्रिल ते २१ मे

प्रतिकिया दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

१. सध्या पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक मुलांच्या परीक्षांपर्यंत कमी होईल, अशी आशा आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजेत. फक्त सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जावी, हीच अपेक्षा आहे. याउलट विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला होम सेंटर देऊन आपापल्या शाळेतच परीक्षा देण्याची संधी मिळाली तर चांगले होईल.

- पल्लवी मालाणी

२. माझे पाल्य जर आता १० वी मध्ये नसते, तर अशा परिस्थितीत आम्ही यावर्षीची परीक्षा कधीच गांभीर्याने घेतली नसती. पण आता १० वीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने आमचाही नाईलाज आहे. मुलांनी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जाणे गरजेचेच आहे. कारण दहावी व बारावीसारख्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या तर मुलांना आणि पालकांनाही त्याचे गांभीर्य राहणार नाही. त्यामुळे योग्य काळजी घेऊन परीक्षा घ्याव्यात.

- अमोल जगताप

प्रतिक्रिया

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते

१. जेईई तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी आता विद्यार्थ्यांना सेंटरवर जावेच लागत आहे. त्यामुळे आता जशी काळजी घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना सेंटरवर पाठवत आहोत, तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठीही पाठवू. काळजी तर खूप वाटते, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने पर्याय नाही.

- मंजुषा चौधरी

२. परीक्षेची वेळ येईपर्यंत कोरोना कमी होईल, अशी आशा वाटते. परिस्थिती याच्या उलटही होऊ शकते. जर त्या वेळी रुग्ण वाढत गेले, तर शासनाला विद्यार्थ्यांना उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन त्यांचा निर्णय बदलावा लागू शकताे.

- तृप्ती पाटील