शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चरसची तस्करी करणाऱ्याची दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम

By admin | Updated: March 15, 2016 00:37 IST

औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ

औरंगाबाद : चरसची तस्करी केल्याच्या आरोपाखाली विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांनी अहमद मोईउद्दीन ऊर्फ महंमद अक्रम महंमद इकबाल यास दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला होता. अहमद मोईउद्दीनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी जिल्हा न्यायालयाची शिक्षा कायम ठेवत आरोपीचे अपील फेटाळले.औरंगाबाद दहशतवादविरोधी पथकातील जमादार अंकुश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीआधारे पोलीस निरीक्षक किशोर कांबळे, शिवा ठाकरे, गोरख जाधव, शशिकांत शिनगारे आदी ३२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७ जानेवारी २०११ रोजी सिडको बसस्थानकावर सापळा रचून अहमद मोईउद्दीनला ताब्यात घेतले होते. त्याच्या जवळच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये उग्र दर्प असलेल्या हिरवट काळ्या रंगाच्या ओलसर व बुरशी आलेल्या गोळ्या सापडल्या. त्या गोळ्या चरस असल्याचे मोईउद्दीनने सांगितले. पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या तक्रारीवरून अहमद मोईउद्दीनविरुद्ध एटीएसचे पोलीस ठाणे असलेल्या मुंबई येथील काळा घोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या खटल्याची सुनावणी औरंगाबादेतील विशेष सत्र न्यायाधीश (एनडीपीएस) एस. जी. शेटे यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजेंद्र मुगदिया यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने ही विनंती गाह्य धरून चरसची तस्करी करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी, १ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेस अहमद मोईउद्दीन याने औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. या अपिलावर न्यायमूर्ती एम. टी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता सरकारी वकील राजेंद्र ढासळकर यांनी बाजू मांडली. चरस तस्करास अधिक शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केल्याने खंडपीठाने वरील आदेश दिला.