व्यंकटेश वैष्णव , बीडदहा वर्षापूर्वी पाच-दहा वारकरी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास बसस्थानकात हॉटेल उघडण्याची वाट पहात बसलेले पाहून दैनिकांच्या पार्सल विभागात काम करणाऱ्या काहींनी, खिशात हात घालून दहा-वीस रूपये काढले, त्यातल्याच एकाने घरी जाऊन स्टोव्ह, साखर, चहा पत्ती आणली बसस्थानकातच चहा बनवून वारकऱ्यांना दिला. तेव्हापासून आज पर्यंत ही वारकऱ्यांच्या अल्प उपहाराची सेवा अखंडपणे सुरू आहे. यंदा या सेवेला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. याबद्दल घेतलेला आढावा...बीड येथील बस्थानकात आषाढी एकादशीच्या नंतर विठ्ठलाचे दर्शन घेवून परतणाऱ्या वारकऱ्यांना वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत नाष्टा, चहापाणी दिले जाते. पढंरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांना ठिकठिकाणी जेवन दिले जाते. मात्र परतीच्या वारकऱ्यांच्या जेवनाची अथवा नाष्टयाची व्यवस्था तुरळक ठिकाणीच केली जाते. यामध्ये बीड येथे विविध दैनिकांच्या पार्सल विभागात, मशिनवर काम करणारे कर्मचारी, वृत्तपत्र एजन्सी चालक, हॉकर्स, बसस्थानकातील पोलिस चौकीचे कर्मचारी, हमाल, हे एकत्र सेवाभाव वृत्तीने परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. यावर्षी या उपक्रमाचा दशकपूर्ती सोहळा असल्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी सांगितले.रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीरवारकरी प्रतिष्ठाणच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त यंदा वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी व प्राथमिक औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर घेणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.
वारकरी सेवेला दहा वर्षांची परंपरा
By admin | Updated: July 27, 2015 01:12 IST