शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण...

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 18, 2024 06:51 IST

देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी.

प्रभुदास पाटोळे, लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू केली नसती, तर ‘चॉकलेट हीरो’ देवानंद यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षातर्फे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागला, माजी राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि अभिनेत्री हेमा मालिनीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ वकील सुखदेवराव शेळके यांच्यासह मराठवाड्यातील दहा उमेदवार निवडणूक लढले असते.

पक्षात सेवानिवृत्त न्यायमूर्ती अन् डॉक्टरही... - देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी. परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई. त्यांनाही राजकारणाने माेहित केले हाेते. म्हणूनच त्यांनी स्वतःचा ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष काढला हाेता. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.- त्यांच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेते, समाजधुरीण, न्यायदान क्षेत्रातील सेवानिवृत्त उच्च  व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील, डाॅक्टर व सिने कलाकार होते.

...आणि पक्ष गुंडाळला ! 

  • - देवानंद यांनी मुंबईतील हॉटेल ‘सन ॲन्ड सॅन्ड’ मधील पक्षाच्या बैठकीत शरद गव्हाणे यांची मराठवाडा पक्ष प्रमुख म्हणून आणि ॲड. सुखदेवराव शेळके यांची औरंगाबाद जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. शेळके यांच्या ‘बाणगंगेच्या तिरी’ या आत्मकथनपर पुस्तकात हा किस्सा आहे. 
  • - निवडणूक खर्चासाठी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे अभिवचनही देवानंद यांनी दिल्याचे शेळके यांनी नमूद केले आहे.
  • - येथील मंडळी परत औरंगाबादला आल्यानंतर ८-१० दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  देशात आणीबाणी लागू केली.
  • - परिणामी देवानंद यांना त्यांचा पक्ष गुंडाळावा लागला.
टॅग्स :Politicsराजकारण