शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पावसासाठी अश्रूंचा बांध फुटला!

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल तर किमान मुक्या जनावरांसाठी तर पाऊस दे...असे म्हणत आज हजारो नागरिकांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.निमित्त होते, छावणी येथील ईदगाहमध्ये विशेष नमाजचे. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर हजारो नागरिक पायी छावणी ईदगाहमध्ये दाखल झाले. पाऊस यावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून ‘दुआ’ केली. पाण्यासाठी हजारो हात आकाशाकडे सरसावले. तब्बल २५ मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी केलेली दुआ उपस्थित प्रत्येक भाविकाला रडण्यासाठी भाग पाडणारी ठरली.संयोजकांनी चार दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, ईदगाहमध्ये दुपारी ३ वाजता विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आबालवृद्ध ईदगाह मैदानावर पोहोचत होते. नागरिकांचा हा ओघ लक्षात घेऊन संयोजकांनी पाऊण तास उशिराने नमाज सुरू केली. अवघ्या एका तासात छावणी ईदगाह मैदानाला रमजान ईदसारखे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांनी नमाजसाठी पायी येणे पसंत केले. काहींनी तर मुकी जनावरेही आणली होती. अल्लाहला या मुक्या जनावरांवर तरी दया येईल, अशी यामागची संकल्पना आहे.सुरुवातीला मौलाना मनसब खान, हाफेज इकबाल अन्सारी, जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मोईजोद्दीन फारुकी, मौलाना मुजीब उल्ला यांनी मार्गदर्शन केले. सर्व धर्मगुरूंनी पाऊस न येण्यामागची कारणे विशद केली. प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवले तर सृष्टीचा निर्माणकर्ता असा प्रकोप आणणारच नाही. निसर्गाच्या विरोधात माणूस जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.जामा मशीदचे पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी पावसासाठी विशेष नमाज पढविली. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसीन यांनी ‘खुदबा’पढविला. हाफेज जाकेर यांनी विशेष दुआ केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेचा निषेध छावणी ईदगाह येथे पाऊस यावा म्हणून विशेष नमाज आयोजित केली असल्याचे पत्र ईदगाह कमिटीने चार दिवसांपूर्वीच मनपाला दिले होते. नमाज सुरू होईपर्यंत महापालिकेने मैदानावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे हाफेज इकबाल अन्सारी यांनी महापालिकेचा जाहीरपणे निषेध केला. उपस्थित नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला तरी पाण्याचा टँकर शेवटपर्यंत आलाच नाही.