शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

पावसासाठी अश्रूंचा बांध फुटला!

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल तर किमान मुक्या जनावरांसाठी तर पाऊस दे...असे म्हणत आज हजारो नागरिकांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.निमित्त होते, छावणी येथील ईदगाहमध्ये विशेष नमाजचे. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर हजारो नागरिक पायी छावणी ईदगाहमध्ये दाखल झाले. पाऊस यावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून ‘दुआ’ केली. पाण्यासाठी हजारो हात आकाशाकडे सरसावले. तब्बल २५ मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी केलेली दुआ उपस्थित प्रत्येक भाविकाला रडण्यासाठी भाग पाडणारी ठरली.संयोजकांनी चार दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, ईदगाहमध्ये दुपारी ३ वाजता विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आबालवृद्ध ईदगाह मैदानावर पोहोचत होते. नागरिकांचा हा ओघ लक्षात घेऊन संयोजकांनी पाऊण तास उशिराने नमाज सुरू केली. अवघ्या एका तासात छावणी ईदगाह मैदानाला रमजान ईदसारखे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांनी नमाजसाठी पायी येणे पसंत केले. काहींनी तर मुकी जनावरेही आणली होती. अल्लाहला या मुक्या जनावरांवर तरी दया येईल, अशी यामागची संकल्पना आहे.सुरुवातीला मौलाना मनसब खान, हाफेज इकबाल अन्सारी, जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मोईजोद्दीन फारुकी, मौलाना मुजीब उल्ला यांनी मार्गदर्शन केले. सर्व धर्मगुरूंनी पाऊस न येण्यामागची कारणे विशद केली. प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवले तर सृष्टीचा निर्माणकर्ता असा प्रकोप आणणारच नाही. निसर्गाच्या विरोधात माणूस जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.जामा मशीदचे पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी पावसासाठी विशेष नमाज पढविली. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसीन यांनी ‘खुदबा’पढविला. हाफेज जाकेर यांनी विशेष दुआ केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेचा निषेध छावणी ईदगाह येथे पाऊस यावा म्हणून विशेष नमाज आयोजित केली असल्याचे पत्र ईदगाह कमिटीने चार दिवसांपूर्वीच मनपाला दिले होते. नमाज सुरू होईपर्यंत महापालिकेने मैदानावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे हाफेज इकबाल अन्सारी यांनी महापालिकेचा जाहीरपणे निषेध केला. उपस्थित नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला तरी पाण्याचा टँकर शेवटपर्यंत आलाच नाही.