शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

पावसासाठी अश्रूंचा बांध फुटला!

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल

औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल तर किमान मुक्या जनावरांसाठी तर पाऊस दे...असे म्हणत आज हजारो नागरिकांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.निमित्त होते, छावणी येथील ईदगाहमध्ये विशेष नमाजचे. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर हजारो नागरिक पायी छावणी ईदगाहमध्ये दाखल झाले. पाऊस यावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून ‘दुआ’ केली. पाण्यासाठी हजारो हात आकाशाकडे सरसावले. तब्बल २५ मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी केलेली दुआ उपस्थित प्रत्येक भाविकाला रडण्यासाठी भाग पाडणारी ठरली.संयोजकांनी चार दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, ईदगाहमध्ये दुपारी ३ वाजता विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आबालवृद्ध ईदगाह मैदानावर पोहोचत होते. नागरिकांचा हा ओघ लक्षात घेऊन संयोजकांनी पाऊण तास उशिराने नमाज सुरू केली. अवघ्या एका तासात छावणी ईदगाह मैदानाला रमजान ईदसारखे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांनी नमाजसाठी पायी येणे पसंत केले. काहींनी तर मुकी जनावरेही आणली होती. अल्लाहला या मुक्या जनावरांवर तरी दया येईल, अशी यामागची संकल्पना आहे.सुरुवातीला मौलाना मनसब खान, हाफेज इकबाल अन्सारी, जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मोईजोद्दीन फारुकी, मौलाना मुजीब उल्ला यांनी मार्गदर्शन केले. सर्व धर्मगुरूंनी पाऊस न येण्यामागची कारणे विशद केली. प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवले तर सृष्टीचा निर्माणकर्ता असा प्रकोप आणणारच नाही. निसर्गाच्या विरोधात माणूस जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.जामा मशीदचे पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी पावसासाठी विशेष नमाज पढविली. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसीन यांनी ‘खुदबा’पढविला. हाफेज जाकेर यांनी विशेष दुआ केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेचा निषेध छावणी ईदगाह येथे पाऊस यावा म्हणून विशेष नमाज आयोजित केली असल्याचे पत्र ईदगाह कमिटीने चार दिवसांपूर्वीच मनपाला दिले होते. नमाज सुरू होईपर्यंत महापालिकेने मैदानावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे हाफेज इकबाल अन्सारी यांनी महापालिकेचा जाहीरपणे निषेध केला. उपस्थित नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला तरी पाण्याचा टँकर शेवटपर्यंत आलाच नाही.