शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

शिक्षकांनी ‘रोल मॉडेल’ व्हावे

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

औरंगाबाद : शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि सुसंस्कृत करणे हा शिक्षकांचा धर्म आहे. त्याचा विसर न पडू देता शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. नारनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उच्च शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन व संशोधनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ प्राध्यापकांना विद्यापीठाने शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. या समारंभात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक तथा मौलाना आझाद अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. हमीद खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.डी. शिरसाट, संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. बापू शिंगटे, याशिवाय संलग्नित महाविद्यालयातील ५ प्राध्यापकांपैकी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे डॉ. नारायण बोराडे, देवगिरी महाविद्यालयाचे डॉ. एस. एम. हेळंबे, अंबड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद पंडित, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. संजय अस्वले व बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हीच राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठामध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत; पण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, इच्छाशक्ती नसेल तर संशोधनामध्ये अपेक्षित काम होणार नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. ते राष्ट्रहितासाठी लाभदायी ठरेल. यावेळी कुलगुरू डॉ. कोणत्याही देशाच्या निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे राहिलेले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांत शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. भारतात प्राचीन काळापासून शिक्षकांचे योगदान राहिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकांसाठी अध्ययन, अध्यापन व संशोधन ही तीनच कामे आयुष्यभर केली पाहिजेत. बाबासाहेबांच्या या विचाराने शिक्षकांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेश करपे यांनी मानले.