शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

शिक्षकांनी ‘रोल मॉडेल’ व्हावे

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

औरंगाबाद : शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि सुसंस्कृत करणे हा शिक्षकांचा धर्म आहे. त्याचा विसर न पडू देता शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. नारनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उच्च शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन व संशोधनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ प्राध्यापकांना विद्यापीठाने शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. या समारंभात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक तथा मौलाना आझाद अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. हमीद खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.डी. शिरसाट, संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. बापू शिंगटे, याशिवाय संलग्नित महाविद्यालयातील ५ प्राध्यापकांपैकी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे डॉ. नारायण बोराडे, देवगिरी महाविद्यालयाचे डॉ. एस. एम. हेळंबे, अंबड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद पंडित, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. संजय अस्वले व बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हीच राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठामध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत; पण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, इच्छाशक्ती नसेल तर संशोधनामध्ये अपेक्षित काम होणार नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. ते राष्ट्रहितासाठी लाभदायी ठरेल. यावेळी कुलगुरू डॉ. कोणत्याही देशाच्या निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे राहिलेले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांत शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. भारतात प्राचीन काळापासून शिक्षकांचे योगदान राहिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकांसाठी अध्ययन, अध्यापन व संशोधन ही तीनच कामे आयुष्यभर केली पाहिजेत. बाबासाहेबांच्या या विचाराने शिक्षकांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेश करपे यांनी मानले.