शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वेतन विलंबनाचा शिक्षकांना फटका..

By admin | Updated: August 8, 2016 00:38 IST

जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही.

जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही. या विलंबनाचा शिक्षकांना फटका बसत असून, विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेली शालार्थ प्रणाली कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाचे साडेसहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यात माध्यमिक ३२ व हायस्कूलच्या २०० शिक्षकांचा सुध्दा समावेश आहे. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० शिक्षक सभासद कर्जदार आहेत. या सर्व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला होणे अपक्षित आहे.परंतु तसे होत नाही. महिन्याचा १ ते ५ तारखेपर्यंत आॅनलाईन बिले सादर केल्यास तरच वेतन वेळेवर होण्याची शक्यता असते. परंतु मुख्याध्यापकापासून ते गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि गटविकास अधिकाऱ्यांसह जी यंत्रणा यामध्ये काम करते ती सुरळीतपणे काम करत नसल्याचा आरोप शिक्षकांतून केला जात आहे. जर या यंत्रणेला नेमून दिलेले कामे ती नमूद तारखेत करण्याची कुठलेच बंधन नसल्याने त्यांच्या सोयीनुसार वेतनाची बिले सादर करण्यात येतात. त्यामुळे वेतनास विलंब होत असून, यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. परिणामी शिक्षकांना मिळणारे वेतन वेळेत मिळत नसल्याने बँका, सोसायटी, आणि एलआयसी यांच्याकडून दर महिन्याला आकारण्यात येत असलेल्या कर्जावर दरसाल दरशेकडा १३ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)