शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

वेतन विलंबनाचा शिक्षकांना फटका..

By admin | Updated: August 8, 2016 00:38 IST

जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही.

जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही. या विलंबनाचा शिक्षकांना फटका बसत असून, विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेली शालार्थ प्रणाली कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाचे साडेसहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यात माध्यमिक ३२ व हायस्कूलच्या २०० शिक्षकांचा सुध्दा समावेश आहे. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० शिक्षक सभासद कर्जदार आहेत. या सर्व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला होणे अपक्षित आहे.परंतु तसे होत नाही. महिन्याचा १ ते ५ तारखेपर्यंत आॅनलाईन बिले सादर केल्यास तरच वेतन वेळेवर होण्याची शक्यता असते. परंतु मुख्याध्यापकापासून ते गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि गटविकास अधिकाऱ्यांसह जी यंत्रणा यामध्ये काम करते ती सुरळीतपणे काम करत नसल्याचा आरोप शिक्षकांतून केला जात आहे. जर या यंत्रणेला नेमून दिलेले कामे ती नमूद तारखेत करण्याची कुठलेच बंधन नसल्याने त्यांच्या सोयीनुसार वेतनाची बिले सादर करण्यात येतात. त्यामुळे वेतनास विलंब होत असून, यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. परिणामी शिक्षकांना मिळणारे वेतन वेळेत मिळत नसल्याने बँका, सोसायटी, आणि एलआयसी यांच्याकडून दर महिन्याला आकारण्यात येत असलेल्या कर्जावर दरसाल दरशेकडा १३ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)