शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मराठवाड्यात करदाते वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:00 IST

नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देअसीमकुमार : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षात मराठवाड्यातून दीड हजार कोटी रुपयांचा आयकर वसूल करण्यात येणार आहे. मागील वर्षभरात सव्वालाख नवीन आयकरदात्यांची संख्या वाढविण्यात विभागाला यश आले असल्याची माहिती मुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी येथे दिली.केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मराठवाड्यातील आयकर विभागाच्या कार्याचा आढावा व अर्थसंकल्पाबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी असीमकुमार बुधवारी औरंगाबादेत आले होते. मागील दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी नाशिक येथे मुख्य आयकर आयुक्तपदाचे सूत्र स्वीकारले. नाशिक विभाग व मराठवाडा विभाग त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे. आज सकाळपासूनच छावणीतील आयकर विभागात मॅरेथॉन बैठका सुरूहोत्या. मराठवाड्यातील आयकर विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या बैठकांना हजर होते. विभागाचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. असीमकुमार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. जीडीपी वाढतआहे.नवीन आर्थिक वर्षासाठी नाशिक विभाग व औरंगाबाद विभाग मिळून ५८०० कोटींचे आयकर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद विभागाला दीड हजार कोटी रुपये आयकरातून वसूल करायचे आहे. यात टीडीएस वसुलीचाही समावेश आहे. मागील आर्थिक वर्षात मराठवाड्यात नवीन सव्वा कोटी आयकरदाते जोडल्या गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व के.पी.सी.राव यांची उपस्थिती होती.आयकर विभागाचे दरवाजे खुलेप्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, आयकरसंदर्भात कोणाला काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी आयकर विभागाचे दरवाजे केव्हाही खुले आहेत. आयकर भरण्यासंदर्भात अडचणी असतील तर थेट आयकर विभागात येऊन शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.देशाच्या उन्नतीसाठी आयकर वेळेवर भरामुख्य आयकर आयुक्त असीमकुमार यांनी आवाहन केले की, देशाच्या उन्नतीसाठी, येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करदात्यांनी कर वेळेवर भरणे आवश्यक आहे. तसेच करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आयकर विभागाच्या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये करचुकवेगिरी करणारे बरोबर सापडल्या जातो. यामुळे कोणी गाफील राहू नये, असा इशाराही त्यांनी दिला.सेंट्रल अ‍ॅक्शन प्लॅननवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर करदात्यांची संख्या वाढविणे व आयकराचे दीड हजार कोटींचे नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयकर विभागाच्या वतीने सेंट्रल अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती असीमकुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले की, याअंतर्गत पुढील तीन महिन्यांत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुका पातळीवर अधिकारी जाऊन जनजागृती करणार आहेत. तसेच करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.