शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
3
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
4
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
5
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
6
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
7
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
8
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
9
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
10
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
11
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
12
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
13
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
14
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
15
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

तूर तेजीत सोयाबीनचे दर घसरले

By admin | Updated: August 7, 2014 23:30 IST

हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली.

हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली. तुरीच्या बाबतीत गुरूवारी ही प्रचिती आल्याने क्विंटलामागे ४ हजार ८५० रूपयांचा कमाल भाव गेला; परंतु उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांचाच माल अधिक असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरीकडे सोयाबीनच्या भावात घट पाहवयास मिळाली. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. वार्षिक उलाढालीमुळे पहिल्यापासून बाजार समिती ‘अ’ गटातमध्ये समाविष्ट आहे. हळद आणि सोयाबीनची वर्षभर खरेदी बाजार समितीत सुरू असते; परंतु गतवर्षी उत्पादनात घट झाल्याने प्रतिवर्षीप्रमाणे सोयाबीनची खरेदी-विक्री समितीत झाली नाही. हंगामाप्रमाणे सध्या भावातही घट झाली. बाजारात आवक नसतानाही ४ हजारांवर सोयाबीन घसरले. गुरूवारी सकाळी ३ हजार ४९० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन कमाल दर ३ हजार ८३० वर पोहोचला. मागील पंधरवड्यात ४ हजार ३०० रूपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. तुरीची उलट स्थिती झाली असून संपूर्ण हंगामात सव्वाचार हजारांच्यावर न गेलेली तूर पाच हजारांजवळ पोहचली. गुरूवारी पहिल्यांदाच तुरीला ४ हजार ८५० रूपयांचा सर्वोच्च दर मिळाला. प्रारंभी ४ हजार ३१० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. जिल्ह्यात गतवर्षी तुरीचे क्षेत्र केवळ ३२ हजार हेक्टर असल्यामुळे उत्पादन देखील कमी आहे. त्यातच आर्थिक चणचणीपायी लवकर उत्पादकांनी तुरीला बाजार दाखविली. त्यामुळे सध्या बाजार समितीत तुरीचे आवक कमी आहे. येणारी तूर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्याचीच अधिक असल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत आहे. (प्रतिनिधी)