शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनने शिकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना बनवले तंत्रस्नेही : अडथळ्यांवर मात करुन शोधल्या वेगळ्या वाटा औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीपूर्वी खडू-फळाएवढ्या मर्यादित असलेल्या ...

विद्यार्थी, पालक, शिक्षकांना बनवले तंत्रस्नेही : अडथळ्यांवर मात करुन शोधल्या वेगळ्या वाटा

औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीपूर्वी खडू-फळाएवढ्या मर्यादित असलेल्या शिक्षणाने महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण विस्तारले. ऑनलाईन शिकावे लागेल, हे स्वप्नातही नव्हते. २० ते ३० टक्के मुलांपर्यंत शिक्षण या माध्यमातून पोहोचले. तरी माहिती संवादाचे तंत्रज्ञान वापराचे ज्ञान मुलांना बालवयातच मिळाले. शिक्षकांनीही ते आत्मसात केले. शिवाय पालकांनाही तंत्रस्नेही बनविले, असे मत शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य सहकार्यवाह एस. पी. जवळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

एखादी महामारी ३६५ दिवस येईल, त्यात शिकावे लागेल हे कुणाच्याही स्वप्नी नव्हते. त्याचे अनेक दुष्परिमाण झाले असले तरी शिक्षणाच्या दृष्टीने शाळांना, पालकांना, शिक्षकांना बहुआयामी बनविले. पालक मुलांच्या शिक्षणात लक्ष देऊ लागले. स्वाध्याय, अभ्यासास महत्त्व आले. सुरुवातीला स्मार्ट फोनच्या उपलब्धतेच्या, नेटवर्कच्या समस्या होत्या. मात्र, त्यावरही मात करून एक फोन घरात कसा वापरायचा, त्याचे व्यवस्थापन झाले. त्यातून आदानप्रदान करीत सर्वच शिकले. मात्र, गरजेचे तंत्रज्ञान वयोवृद्धांनीही लहानग्यांकडून शिकून घेतले. आता शाळांत शारीरिक, परिसरची स्वच्छता, भविष्यातील संकटासाठीची तयारी करायला शिकविल्याने दुसरी लाट मोठी असताना ती भीती राहिली नाही. आपण कृतिप्रिय शिक्षणाकडे वळलो. हस्तांदोलन टाळून दुरून नमस्कार, आरोग्य विज्ञान शिकलो. वेळेचे व्यवस्थापन त्यात गृहिणींनाही नियोजनात त्यांचे काैशल्य दाखविण्याचे स्थान मिळाले. महामारीने जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले. आलेल्या परिस्थितीला हाताळणे शिकविले. आता संस्थाचालक म्हणून आकस्मिक निधीचे शाळा आणि शासनाने मिळून नियोजन केले पाहिजे, असे जवळकर यांनी सांगितले.

(अपूर्ण)