शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नाला सरळीकरणासाठी ५०० कि.मी.चे लक्ष्य

By admin | Updated: May 22, 2015 00:33 IST

हणमंत गायकवाड , लातूर जलयुक्त शिवार अभियानात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे २०० कि.मी. अंतराचे काम पूर्णत्त्वास आले आहे.

हणमंत गायकवाड , लातूरजलयुक्त शिवार अभियानात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे २०० कि.मी. अंतराचे काम पूर्णत्त्वास आले आहे. मे अखेर ५०० कि.मी. अंतराचे लक्ष्य ठेवून जिल्हाधिकारी दररोज जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेत आहेत. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक दर सोमवारी तर होतेच. शिवाय, दिवसाला किमान एका कामाला भेट देऊन ऊर्जा वाढविण्याचे काम केले जात आहे.लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा सिलसिला सुरू आहे. लातूर तालुक्यातील २८, औसा ३५, निलंगा ३१, रेणापूर १६, शिरूर अनंतपाळ ९, उदगीर २२, अहमदपूर २२, चाकूर १८, देवणी ११, जळकोट १० अशा एकूण २०२ गावांमध्ये नाला सरळीकरण, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला बंधारा, हातपंपाचे पुनर्भरण, माती बंधारा, बंधाऱ्याचे नूतनीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्याचे नूतनीकरण, दुरुस्ती, साखळी सिमेंट बंधारे, शेततळे, पुनर्भरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवारातील पाणी शिवारात आणि गावातील पाणी गावात अडविण्यासाठी जलसंधारण, कृषी, जिल्हा परिषद अशा विविध विभागांमार्फत कामे केली जात आहेत. त्यात लोकांचा सहभाग वाढविला जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या सरासरीनुसार पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्याचा मानस जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. किल्लारी, उजनी, मातोळा, बुधोडा, खरोसा, रामेगाव, नकुलेश्वर बोरगाव, उंबडगा (खु.), बाणेगाव, उंबडगा (बु.), औसा, तळणी, कारला, लांबोटा, निलंगा, कलमुगळी, नेलवाड, औंढा, कासारशिरसी, बोळेगाव चिंचोली, लाळी, सताळा, वलांडी, देवणी, कव्हा, बामणी, पारधेवाडी, पाखरसांगवी, शिरसी, कातपूर, बाभळगाव, ईटी, शिवणी मांजरा, चामरगा, बाकली, डोंगरगाव बोरी आदी गावांत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाने गती घेतली आहे. २१५ लाख रुपये खर्च करून ही कामे करण्यात येत आहेत. त्यात १२९.२४ लाखांचा लोकसहभाग आहे.