शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टँकर वाढले

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, यापैकी ७७ प्रस्ताव दाखल झाले. पैकी ६० गावांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, या गावांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर-१६, औसा-६, निलंगा-७, रेणापूर-४, अहमदपूर-१५, चाकूर-८, शिरूर अनंतपाळ-१, उदगीर-१८, देवणी-४, जळकोट-९ अशा एकूण ८८ गाव-वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यापैकी लातूर-८, औसा-३, निलंगा-४, रेणापूर-३, अहमदपूर-११, चाकूर-७, उदगीर-१९, देवणी-२, जळकोट-३ अशा एकूण ६० गाव-वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज या गावांना १५८ फेऱ्या या टँकरद्वारे होत आहेत. जिल्ह्यातील ५७७ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांवर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. यापैकी ३९७ गाव-वाड्यांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यानुसार अधिग्रहणाची संख्या ५२५ वर गेली आहे. बोअर, विहिरींचा अधिग्रहणात समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ पाणीपुरवठ्याच्या योजनाही टंचाई म्हणून राबविण्यात येत आहेत. नळदुरुस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहिरी घेणे, बुडक्या घेणे, चर खोदणे आदी उपाययोजना करून पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. (प्रतिनिधी)