शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

जिल्ह्यात टँकर वाढले

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा

लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, यापैकी ७७ प्रस्ताव दाखल झाले. पैकी ६० गावांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, या गावांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर-१६, औसा-६, निलंगा-७, रेणापूर-४, अहमदपूर-१५, चाकूर-८, शिरूर अनंतपाळ-१, उदगीर-१८, देवणी-४, जळकोट-९ अशा एकूण ८८ गाव-वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यापैकी लातूर-८, औसा-३, निलंगा-४, रेणापूर-३, अहमदपूर-११, चाकूर-७, उदगीर-१९, देवणी-२, जळकोट-३ अशा एकूण ६० गाव-वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज या गावांना १५८ फेऱ्या या टँकरद्वारे होत आहेत. जिल्ह्यातील ५७७ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांवर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. यापैकी ३९७ गाव-वाड्यांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यानुसार अधिग्रहणाची संख्या ५२५ वर गेली आहे. बोअर, विहिरींचा अधिग्रहणात समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ पाणीपुरवठ्याच्या योजनाही टंचाई म्हणून राबविण्यात येत आहेत. नळदुरुस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहिरी घेणे, बुडक्या घेणे, चर खोदणे आदी उपाययोजना करून पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. (प्रतिनिधी)