लातूर : टँकरचे पाणी मिळत नसल्याने सिद्धेश्वर नगर भागातील महिलांनी विवेकानंद चौकातील पाण्याच्या टाकी कार्यालयात स्वत:ला कोंडवून घेतले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. जवळपास दोन तास पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान, पाणीपुरवठा बंद करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनोद रणसुभे यांनी ठिय्या मांडला. त्यामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच पंचाईत झाली.विवेकानंद चौक येथील पाण्याची टाकी येथे शहरातील सिद्धेश्वर नगर, मळवटी रोड भागातील मनसेचे राज क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी चंदू बगडे, योगेश उफाडे, आशाताई धोंडगे, पद्मिनी चिकटे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पाणीपुरवठा विभाग प्रमुख डी.जी. यादव, आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी नगरसेवक रणसुभे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनीही आंदोलन मागे घेतले.
टँकरच्या पाण्यासाठी वादावादी !
By admin | Updated: February 14, 2016 00:01 IST