शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

पाऊस लांबल्याने टँकर गेले सहाशेवर..!

By admin | Updated: June 16, 2016 00:04 IST

जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस लांबल्यास जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यातच टँकरच्या नियमित फेऱ्या होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आठही तालुक्यातील मध्यम आणि लघुप्रकल्प कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात ५५० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. जून महिन्यात पाऊस पडेल या आशेवर टँकरची संख्या होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी चिन्हे होती. परंतु अद्यापही पाऊस पडला नसल्याने ५० टँकरची वाढ होऊन आकडा ६०० वर पोहचला आहे.पाणीपुरवठ्यावर जि.प. कडून लाखो रूपये खर्च करण्यात येत असून सुध्दा नागरिकांनी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत. काही दिवस पाऊस लांबल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. यासाठी आत्तापासून बीडीओ आणि तहसील कार्यालयाकडून नियोजन करण्याची गरज आहे. कारण टँकरसाठी आरक्षित करण्यात आलेल्या विहिरी,कूपनिलकांच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.जिल्ह्याला परफेक्ट रोडलाईन या खाजगी एजन्सी मार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. त्या त्या तालुक्याचे बीडीओ आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली टँकरच्या नियमित फेऱ्या होतात की नाही याची पाहणी करण्याची जिम्मेदारी दिली आहे. परंतु अधिकारी कर्मचाऱ्याच्या मिलिभगतमुळे अनेक गावात नेमून दिलेल्या टँरच्या फेऱ्याच होत नसल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पाण्यावरून राजकारण करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई पाहता जादा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. (प्रतिनिधी)