शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने टँकर गेले सहाशेवर..!

By admin | Updated: June 16, 2016 00:04 IST

जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जालना : ७ जूनला पडणारा मृग नक्षत्राचा पाऊस अद्यापही बरसला नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आत्ता वाढीव म्हणजेच ६०० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस लांबल्यास जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यातच टँकरच्या नियमित फेऱ्या होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आठही तालुक्यातील मध्यम आणि लघुप्रकल्प कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात ५५० टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. जून महिन्यात पाऊस पडेल या आशेवर टँकरची संख्या होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी चिन्हे होती. परंतु अद्यापही पाऊस पडला नसल्याने ५० टँकरची वाढ होऊन आकडा ६०० वर पोहचला आहे.पाणीपुरवठ्यावर जि.प. कडून लाखो रूपये खर्च करण्यात येत असून सुध्दा नागरिकांनी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आहेत. काही दिवस पाऊस लांबल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. यासाठी आत्तापासून बीडीओ आणि तहसील कार्यालयाकडून नियोजन करण्याची गरज आहे. कारण टँकरसाठी आरक्षित करण्यात आलेल्या विहिरी,कूपनिलकांच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे.जिल्ह्याला परफेक्ट रोडलाईन या खाजगी एजन्सी मार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे काम दिले गेले आहे. त्या त्या तालुक्याचे बीडीओ आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली टँकरच्या नियमित फेऱ्या होतात की नाही याची पाहणी करण्याची जिम्मेदारी दिली आहे. परंतु अधिकारी कर्मचाऱ्याच्या मिलिभगतमुळे अनेक गावात नेमून दिलेल्या टँरच्या फेऱ्याच होत नसल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पाण्यावरून राजकारण करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई पाहता जादा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. (प्रतिनिधी)