शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

प्रतिभावंत उर्दू कवी काझी सलीम यांनी एक लाखात जिंकली होती लोकसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:30 IST

प्रतिभावंत उर्दू कवी असलेले काझी सलीम यांचा जन्म जालना जिल्ह्यात १९२८ मध्ये झाला. अलिगड विद्यापीठातून बी.ए. केल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. 

ठळक मुद्देलोकसभेच्या सातव्या निवडणुकीत सत्तेत पुन्हा काँग्रेस साहेबराव डोणगावकरांचा दणदणीत पराभव

- शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : निवडणुका किती महाग झाल्या आहेत, याची चर्चा सध्या जागोजागी रंगते आहे. उमेदवारांना सध्या प्रचारावर ७० लाख रुपये खर्च करता येतात; परंतु १९८० साली झालेली लोकसभेची सातवी निवडणूक काँग्रेसचे उमेदवार प्रख्यात शायर काझी सलीम यांनी फक्त एक लाख रुपये खर्चात जिंकली होती यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

काँग्रेसला आणीबाणीचा फटका बसल्याने १९७७ मध्ये देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले; परंतु देशातील पहिल्या युती सरकारचा प्रयोग पूर्ण फसला. सत्ताधारी जनता दलातील नेत्यांची वाढलेली राजकीय इच्छा व विरोधी तत्त्वांचा संघर्ष होऊन अवघ्या दोन वर्षांत मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. लोकदलाचे चरणसिंग ६४ खासदारांना सोबत घेऊन या सरकारातून बाहेर पडले. काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी चरणसिंगांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली; परंतु संसदेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच केवळ दोनच दिवसांत इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतला व संसदेला सामोरे न जाताच चरणसिंग सरकारही कोसळले. त्यामुळे राष्ट्रपतींनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. जानेवारी १९८० मध्ये ही निवडणूक झाली. 

औरंगाबादेतून काँग्रेसने काझी सलीम यांना उमेदवारी दिली. काँग्रेस (यु)ने साहेबराव पाटील डोणगावकरांना तिकीट दिले. या निवडणुकीत ११ उमेदवार उभे होते. ६ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात ३ लाख ४६ हजार ३३५ मतदारांनी सहभाग घेतला. काझी सलीम यांना १ लाख ६९ हजार ७२३ एवढे विक्रमी मतदान झाले. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी डोणगावकर यांना ८५ हजार ९७५ मते मिळाली. इतर नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात टी. एस. पाटील (मते ५३ हजार २८१- जनता दल), एस. टी. प्रधान (११ हजार ५५७- रिपब्लिकन पार्टी), किसन श्रीपत (५१४१), दिलावर खान अब्बास खान (१८६०), कचरू बाजीराव (१४८६), पंडितराव शिंदे (१३६५), शेख कासीम किस्मतवाला (१२५२), रावसाहेब हरिभाऊ नरवडे (११२६), रावसाहेब पगारे (६१९, सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.

सातव्या लोकसभेत ९.३ टक्के मुस्लिम खासदारऔरंगाबाद मतदारसंघातून काझी सलीम सातव्या लोकसभेचे सदस्य झाले. या निवडणुकीत विविध पक्षांमार्फत देशभरातून लोकसभेत ५० हून अधिक म्हणजे एकूण खासदाराच्या ९.३ टक्के मुस्लिम खासदार पोहोचले होते. मुस्लिम समाजाच्या खासदारांची ही आतापर्यंची संसदेतील सर्वात मोठी उपस्थिती व भागीदारी ठरली आहे. महाराष्ट्रातून तेव्हा औरंगाबादेतून काझी सलीम व वाशिममधून गुलाम नबी आझाद हे खासदार झाले, तर मोहम्मद अब्दुल रज्जाक नूर मोहम्मद (अकोला) व काझी उमर (रत्नागिरी) यांचा थोडक्यात पराभव झाला होता. 

सहाव्या लोकसभेत मराठवाड्यासह महाराष्ट्राने काँग्रेसला जोरदार फटका दिला होता. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ २०, तर मराठवाड्यात फक्त एक जागा मिळाली होती. १९८० मध्ये हे चित्र बदलून काँग्रेसला राज्यात ४१ व मराठवाड्यातील सर्व ८ जागा मिळाल्या. देशपातळीवर काँग्रेस आघाडीने ३७४ जागा पटकावून देशाच्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा इंदिरा गांधी विराजमान झाल्या.

काझी सलीम यांचा अल्पपरिचयविद्यार्थी दशेपासूनच ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय काम करीत होते. १९५५ मध्ये या पक्षातर्फे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली व केवळ २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. १९६२-८० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत दोनदा सदस्य झाले. १९८० मध्ये खासदार म्हणून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांनी मराठवाडा रेल्वे रुंदीकरणासाठी सभागृहात पक्षावर तोफ डागली व संसदेबाहेर आंदोलनही केले. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टेड करून पक्षाने नोटीसही बजावली होती. मराठवाडा विकास आंदोलनातही ते अग्रभागी होते. औरंगाबादेत उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेरूळ विकास योजनेचे अध्यक्ष असताना वेरुळात शहाजी राजांचे स्मारक, घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्यासाठी धर्मशाळा यासह अनेक योजना त्यांनी सरकारला सुचविल्या; परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. परंपरेशी विद्रोह करणारा संवेदनशील मनाचा हा शायर राजकारणात मात्र पूर्ण रमला नाही. त्यांचे ‘नजात से पहले’ व ‘रुस्तगारी’ हे कवितासंग्रह गाजले. त्यांना राज्य व उर्दू साहित्य अकादमीचा वली दखनी पुरस्कारही मिळाला. ८ मे २००५ ला त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद