शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

प्रतिभावंत उर्दू कवी काझी सलीम यांनी एक लाखात जिंकली होती लोकसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:30 IST

प्रतिभावंत उर्दू कवी असलेले काझी सलीम यांचा जन्म जालना जिल्ह्यात १९२८ मध्ये झाला. अलिगड विद्यापीठातून बी.ए. केल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. 

ठळक मुद्देलोकसभेच्या सातव्या निवडणुकीत सत्तेत पुन्हा काँग्रेस साहेबराव डोणगावकरांचा दणदणीत पराभव

- शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : निवडणुका किती महाग झाल्या आहेत, याची चर्चा सध्या जागोजागी रंगते आहे. उमेदवारांना सध्या प्रचारावर ७० लाख रुपये खर्च करता येतात; परंतु १९८० साली झालेली लोकसभेची सातवी निवडणूक काँग्रेसचे उमेदवार प्रख्यात शायर काझी सलीम यांनी फक्त एक लाख रुपये खर्चात जिंकली होती यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

काँग्रेसला आणीबाणीचा फटका बसल्याने १९७७ मध्ये देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले; परंतु देशातील पहिल्या युती सरकारचा प्रयोग पूर्ण फसला. सत्ताधारी जनता दलातील नेत्यांची वाढलेली राजकीय इच्छा व विरोधी तत्त्वांचा संघर्ष होऊन अवघ्या दोन वर्षांत मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. लोकदलाचे चरणसिंग ६४ खासदारांना सोबत घेऊन या सरकारातून बाहेर पडले. काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी चरणसिंगांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली; परंतु संसदेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच केवळ दोनच दिवसांत इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतला व संसदेला सामोरे न जाताच चरणसिंग सरकारही कोसळले. त्यामुळे राष्ट्रपतींनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. जानेवारी १९८० मध्ये ही निवडणूक झाली. 

औरंगाबादेतून काँग्रेसने काझी सलीम यांना उमेदवारी दिली. काँग्रेस (यु)ने साहेबराव पाटील डोणगावकरांना तिकीट दिले. या निवडणुकीत ११ उमेदवार उभे होते. ६ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात ३ लाख ४६ हजार ३३५ मतदारांनी सहभाग घेतला. काझी सलीम यांना १ लाख ६९ हजार ७२३ एवढे विक्रमी मतदान झाले. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी डोणगावकर यांना ८५ हजार ९७५ मते मिळाली. इतर नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात टी. एस. पाटील (मते ५३ हजार २८१- जनता दल), एस. टी. प्रधान (११ हजार ५५७- रिपब्लिकन पार्टी), किसन श्रीपत (५१४१), दिलावर खान अब्बास खान (१८६०), कचरू बाजीराव (१४८६), पंडितराव शिंदे (१३६५), शेख कासीम किस्मतवाला (१२५२), रावसाहेब हरिभाऊ नरवडे (११२६), रावसाहेब पगारे (६१९, सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.

सातव्या लोकसभेत ९.३ टक्के मुस्लिम खासदारऔरंगाबाद मतदारसंघातून काझी सलीम सातव्या लोकसभेचे सदस्य झाले. या निवडणुकीत विविध पक्षांमार्फत देशभरातून लोकसभेत ५० हून अधिक म्हणजे एकूण खासदाराच्या ९.३ टक्के मुस्लिम खासदार पोहोचले होते. मुस्लिम समाजाच्या खासदारांची ही आतापर्यंची संसदेतील सर्वात मोठी उपस्थिती व भागीदारी ठरली आहे. महाराष्ट्रातून तेव्हा औरंगाबादेतून काझी सलीम व वाशिममधून गुलाम नबी आझाद हे खासदार झाले, तर मोहम्मद अब्दुल रज्जाक नूर मोहम्मद (अकोला) व काझी उमर (रत्नागिरी) यांचा थोडक्यात पराभव झाला होता. 

सहाव्या लोकसभेत मराठवाड्यासह महाराष्ट्राने काँग्रेसला जोरदार फटका दिला होता. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ २०, तर मराठवाड्यात फक्त एक जागा मिळाली होती. १९८० मध्ये हे चित्र बदलून काँग्रेसला राज्यात ४१ व मराठवाड्यातील सर्व ८ जागा मिळाल्या. देशपातळीवर काँग्रेस आघाडीने ३७४ जागा पटकावून देशाच्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा इंदिरा गांधी विराजमान झाल्या.

काझी सलीम यांचा अल्पपरिचयविद्यार्थी दशेपासूनच ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय काम करीत होते. १९५५ मध्ये या पक्षातर्फे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली व केवळ २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. १९६२-८० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत दोनदा सदस्य झाले. १९८० मध्ये खासदार म्हणून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांनी मराठवाडा रेल्वे रुंदीकरणासाठी सभागृहात पक्षावर तोफ डागली व संसदेबाहेर आंदोलनही केले. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टेड करून पक्षाने नोटीसही बजावली होती. मराठवाडा विकास आंदोलनातही ते अग्रभागी होते. औरंगाबादेत उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेरूळ विकास योजनेचे अध्यक्ष असताना वेरुळात शहाजी राजांचे स्मारक, घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्यासाठी धर्मशाळा यासह अनेक योजना त्यांनी सरकारला सुचविल्या; परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. परंपरेशी विद्रोह करणारा संवेदनशील मनाचा हा शायर राजकारणात मात्र पूर्ण रमला नाही. त्यांचे ‘नजात से पहले’ व ‘रुस्तगारी’ हे कवितासंग्रह गाजले. त्यांना राज्य व उर्दू साहित्य अकादमीचा वली दखनी पुरस्कारही मिळाला. ८ मे २००५ ला त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद