शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

औरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 18:48 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा कार्यान्वित 

ठळक मुद्देमुंबई, दिल्लीला ऑटोपार्ट, औषधी होतात रवाना, मालाची आयातआंतरराष्ट्रीय कार्गोचे लक्ष्य

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिनाभरापूर्वी देशांतर्गत कार्गो सेवा कार्यान्वित झाली आहे. या सेवेद्वारे दररोज सुमारे ३ टन विविध माल मुंबई, दिल्लीत पाठविला जात आहे, तर जवळपास १ टन माल या दोन्ही शहरांतून औरंगाबादेत दाखल होत आहे. विमानतळावर रोज २० टन माल ने-आण करण्याची क्षमता असून, लवकरच निर्यात-आयात होणाऱ्या कार्गो सेवेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

जेट एअरवेज विमानसेवा बंद झाल्यानंतर मे महिन्यापासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत कार्गो सेवा ठप्प झाली होती. सप्टेंबरपासून स्पाईस जेट, ट्रू जेट, एअर इंडियाने नव्या विमानसेवा सुरू केल्या. त्यामुळे ७ महिन्यांनंतर ३० डिसेंबर २०१९ पुन्हा एकदा देशांतर्गत कार्गो सेवेला सुरुवात झाली. विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली होती. एका एजन्सीच्या माध्यमातून ही सेवा सुरू होती; परंतु आता  स्वत: विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. या देशांतर्गत कार्गो सेवेने दिल्ली, मुंबई, बंगळुरू याठिकाणी सध्या माल वाहतूक केली जात आहे. एअर इंडिया आणि स्पाईस जेटच्या विमानसेवेद्वारे ही वाहतूक सध्या होत आहे. औरंगाबादहून विमानाद्वारे औद्योगिक, औषधी, टपाल, आॅटो पार्टस् आदी माल पाठविला जात आहे, तर कार्गो सेवेद्वारे शहरात मोबाईल, आॅटो पार्टस् प्रामुख्याने दाखल होत आहेत. 

रस्ते वाहतुकीने अधिक वेळशहरातून रस्ते वाहतुकीने मुंबई, दिल्ली येथे माल पाठविण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे उद्योजकांकडून कार्गो सेवेची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली. कधी ३ टन, कधी ४ टन, तर कधी ५ टनांपर्यंतही माल शहरातून रवाना होत आहे. सरासरी ३ टन पाठविला जातो. येणाऱ्या कार्गोचे प्रमाण सध्या कमी आहे. कार्गो सेवेचा उद्योजक, व्यावसायिकांनी अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. 

आंतरराष्ट्रीय कार्गोचे लक्ष्यचिकलठाणा विमानतळावर देशांतर्गत कार्गो सुरू झालेली आहे. एअर इंडिया, स्पाईस जेटच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा लवकरच सुरू केली जाईल. त्यासाठी विमान कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. -डी.जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळbusinessव्यवसाय