शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

नावे वगळण्याअगोदर आयोगाची परवानगी घ्या

By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आता नाव वगळण्याबाबत सावध धोरण स्वीकारले आहे. मतदार यादीतून नावे वगळण्याआधी आयोगाची परवानगी घ्या, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी आयोगातर्फे राज्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात मृत आणि स्थलांतरित या नावाखाली लाखो नावे यादीतून वगळली गेली. त्यामुळे अनेकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील इतर भागातही असा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही सव्वालाख नावे यादीतून वगळण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ जूनपासून नावनोंदणी, दुरुस्ती, वगळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने वगळणीबाबत परस्पर निर्णय घेऊ नये, नावे वगळायची असतील तर त्यासाठी आयोगाची परवानगी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.तालुक्यात १८ हजार अर्जजिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत औरंगाबाद तालुक्यात २९ जूनपर्यंत एकूण १८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघांप्रमाणेच पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भागही येतो. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सर्वाधिक ८ हजार ६५६ अर्ज मध्य मतदारसंघातून आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम मतदारसंघातून ३ हजार ९०५ आणि पूर्व मतदारसंघातून ३ हजार ८९३ अर्ज आले आहेत.