शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

नावे वगळण्याअगोदर आयोगाची परवानगी घ्या

By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आता नाव वगळण्याबाबत सावध धोरण स्वीकारले आहे. मतदार यादीतून नावे वगळण्याआधी आयोगाची परवानगी घ्या, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी आयोगातर्फे राज्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात मृत आणि स्थलांतरित या नावाखाली लाखो नावे यादीतून वगळली गेली. त्यामुळे अनेकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील इतर भागातही असा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही सव्वालाख नावे यादीतून वगळण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ जूनपासून नावनोंदणी, दुरुस्ती, वगळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने वगळणीबाबत परस्पर निर्णय घेऊ नये, नावे वगळायची असतील तर त्यासाठी आयोगाची परवानगी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.तालुक्यात १८ हजार अर्जजिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत औरंगाबाद तालुक्यात २९ जूनपर्यंत एकूण १८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघांप्रमाणेच पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भागही येतो. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सर्वाधिक ८ हजार ६५६ अर्ज मध्य मतदारसंघातून आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम मतदारसंघातून ३ हजार ९०५ आणि पूर्व मतदारसंघातून ३ हजार ८९३ अर्ज आले आहेत.