शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नावे वगळण्याअगोदर आयोगाची परवानगी घ्या

By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला

औरंगाबाद : मतदार यादीतील नावे चुकीच्या पद्धतीने वगळली गेल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यभरात एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आता नाव वगळण्याबाबत सावध धोरण स्वीकारले आहे. मतदार यादीतून नावे वगळण्याआधी आयोगाची परवानगी घ्या, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी आयोगातर्फे राज्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात मृत आणि स्थलांतरित या नावाखाली लाखो नावे यादीतून वगळली गेली. त्यामुळे अनेकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही. मुंबई, पुणे, अमरावतीसह राज्यातील इतर भागातही असा प्रकार मोठ्या प्रमाणावर झाला. औरंगाबाद जिल्ह्यातही सव्वालाख नावे यादीतून वगळण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीआधी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ९ जूनपासून नावनोंदणी, दुरुस्ती, वगळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र तरीही जिल्हा प्रशासनाने वगळणीबाबत परस्पर निर्णय घेऊ नये, नावे वगळायची असतील तर त्यासाठी आयोगाची परवानगी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आयोगाने दिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.तालुक्यात १८ हजार अर्जजिल्ह्यात ९ जून ते ३० जून या काळात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत औरंगाबाद तालुक्यात २९ जूनपर्यंत एकूण १८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघांप्रमाणेच पैठण आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भागही येतो. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सर्वाधिक ८ हजार ६५६ अर्ज मध्य मतदारसंघातून आले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम मतदारसंघातून ३ हजार ९०५ आणि पूर्व मतदारसंघातून ३ हजार ८९३ अर्ज आले आहेत.