शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘दंड घ्या; पण नियम तोडू द्या’ या मानसिकतेने औरंगाबाद वाहतूक पोलीस त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 13:05 IST

शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्‍या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला. 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्‍या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात ६ लाखांहून अधिक दुचाकी, तर २५ हजार आॅटो रिक्षा, ३५ हजार कार, स्कूल बस, खाजगी बसेस, टॅक्टर, ट्रक, मिनी टेम्पो, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. यासोबतच दरवर्षी ४० ते ५० हजार नवीन दुचाकींची भर पडते. वाढत्या वाहनांसोबतच वाहनचालकांची संख्याही वाढत आहे. नियम मोडून वाहने पळविणार्‍या चालकांवर कारवाई करण्यासाठी शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस निरीक्षक एच.एम. गिरमे, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, १५ पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल अडीचशे कर्मचारी शहराचे वाहतूक नियमन करीत असतात. विविध चौक आणि

रस्त्यावर ३८ वाहतूक सिग्नल आहेत. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस असतात. वाहतूक पोलीस कर्तव्यात व्यग्र असल्याचे दिसताच बेशिस्त वाहनचालक सिग्नल तोडून सुसाट पुढे जातात. यामुळे प्राणांतिक अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विना हेल्मेट, विचित्र नंबर प्लेट, विना नंबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे, यासह अन्य विविध मोटार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीस केसेस करीत असतात. जानेवारी ते गतसप्ताहापर्यंत शहर पोलिसांनी पावणेदोन लाख वाहनचालकांवर बेशिस्तीच्या केसेस करून त्यांच्याकडून तब्बल सव्वाचार कोटी रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांकडून होणार्‍या कारवाईनंतरही वाहनचालक वाहतूक नियम मोडणे सोडत नाहीत. परिणामी रोज वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनचालकांची संख्या वाढतच असते, अशी माहिती सहायक आयुक्त शेवगण यांनी दिली.  

आॅनलाईन दंडाच्या नोटिसाविविध चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे फोटो कॉपी काढून बेशिस्त वाहनचालकांना घरपोच पावत्या देण्यात येतात. यावर्षी सुमारे १० हजार वाहनचालकांना घरपोच नोटिसा देऊन दंड वसूल करण्यात आला.

ग्रामीण पोलिसांनी पकडले २४ हजार वाहनचालकऔरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत  २४ हजार ५७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५७ लाख ८४ हजार ७०७ रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी ३३ हजार ३८० वाहनचालकांवर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून ९७ लाख ३५ हजार ८२९ रुपये दंड वसूल करण्यात आला होता.