शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

‘दंड घ्या; पण नियम तोडू द्या’ या मानसिकतेने औरंगाबाद वाहतूक पोलीस त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 13:05 IST

शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्‍या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला. 

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असतात. या पोलिसांना चकमा देत रोज शेकडो वाहनचालक सिग्नल तोडून पळताना नजरेस पडतात. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, विना लायसन्स, ट्रिपलसीट दुचाकी चालविणे, यासह अन्य वाहतूक नियम तोडून वाहने पळविणार्‍या तब्बल पावणेदोन लाख वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीच्या केसेस केल्याचे समोर आले. जानेवारी ते कालपर्यंत झालेल्या या कारवाईत सव्वाचार लाख रुपये दंड वसूल झाला. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, औरंगाबाद शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात ६ लाखांहून अधिक दुचाकी, तर २५ हजार आॅटो रिक्षा, ३५ हजार कार, स्कूल बस, खाजगी बसेस, टॅक्टर, ट्रक, मिनी टेम्पो, रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. यासोबतच दरवर्षी ४० ते ५० हजार नवीन दुचाकींची भर पडते. वाढत्या वाहनांसोबतच वाहनचालकांची संख्याही वाढत आहे. नियम मोडून वाहने पळविणार्‍या चालकांवर कारवाई करण्यासाठी शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. सहायक पोलीस आयुक्त सी.डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस निरीक्षक एच.एम. गिरमे, पोलीस निरीक्षक मनोज पगारे, १५ पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल अडीचशे कर्मचारी शहराचे वाहतूक नियमन करीत असतात. विविध चौक आणि

रस्त्यावर ३८ वाहतूक सिग्नल आहेत. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलीस असतात. वाहतूक पोलीस कर्तव्यात व्यग्र असल्याचे दिसताच बेशिस्त वाहनचालक सिग्नल तोडून सुसाट पुढे जातात. यामुळे प्राणांतिक अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विना हेल्मेट, विचित्र नंबर प्लेट, विना नंबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणे, यासह अन्य विविध मोटार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीस केसेस करीत असतात. जानेवारी ते गतसप्ताहापर्यंत शहर पोलिसांनी पावणेदोन लाख वाहनचालकांवर बेशिस्तीच्या केसेस करून त्यांच्याकडून तब्बल सव्वाचार कोटी रुपये दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांकडून होणार्‍या कारवाईनंतरही वाहनचालक वाहतूक नियम मोडणे सोडत नाहीत. परिणामी रोज वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनचालकांची संख्या वाढतच असते, अशी माहिती सहायक आयुक्त शेवगण यांनी दिली.  

आॅनलाईन दंडाच्या नोटिसाविविध चौकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे फोटो कॉपी काढून बेशिस्त वाहनचालकांना घरपोच पावत्या देण्यात येतात. यावर्षी सुमारे १० हजार वाहनचालकांना घरपोच नोटिसा देऊन दंड वसूल करण्यात आला.

ग्रामीण पोलिसांनी पकडले २४ हजार वाहनचालकऔरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत  २४ हजार ५७५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५७ लाख ८४ हजार ७०७ रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी ३३ हजार ३८० वाहनचालकांवर वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून ९७ लाख ३५ हजार ८२९ रुपये दंड वसूल करण्यात आला होता.