शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भोगवटा घ्या; अन्यथा तिप्पट कर!

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

औरंगाबाद : शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेताच इमारतींचा वापर सुरू केला आहे.

औरंगाबाद : शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेताच इमारतींचा वापर सुरू केला आहे. अनेकदा आवाहन केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक भोगवटा प्रमाणपत्र घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या इमारतधारकांची यादी तयार करून त्यांना तीन पट मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय मंगळवारी मनपात घेण्यात आला. या निर्णयावर सर्वसाधारण सभेत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.मंगळवारी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक बापू घडामोडे, गटनेते नासेर सिद्दीकी यांची उपस्थिती होती. अनेक व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवानगी घेतात. मात्र, नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेण्यास येत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी मनपाने जाहीर प्रगटन दिले होते.एक महिन्यात भोगवटा न घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिकांनी सहा महिने वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली होती. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र हे माध्यमही चांगले असल्याचे महापौरांनी नमूद केले. शहरात बांधकाम परवानगी घेतल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेण्याची काही मंडळींची इच्छाच नसेल तर आपल्याला ठोस पाऊल उचलावे लागेल. पुण्याच्या धर्तीवर संबंधितांना तीन पट मालमत्ता कर लावण्यात यावा असे आदेशही महापौरांनी दिले. यासंदर्भात प्रशासनाने येणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर प्रशासकीय प्रस्ताव ठेवावा, त्याला अंतिम मंजुरी देण्यात येईल. बेकायदा बांधकामे नियमित करून द्या, असे आवाहनही महापौरांनी केले. उपअभियंता बी. डी.फड यांनी सांगितले की, भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी वॉर्डनिहाय पुन्हा एकदा शिबीर लावण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तीन दिवस हे शिबीर चालणार आहे.गुंठेवारी भागातील फायलीचा विषय बैठकीत चर्चेला आला तेव्हा उपअभियंता फड यांनी २००१ पूर्वीच्या मालकीची कागदपत्रे असणाऱ्यांचे भूखंड, घरे नियमित होऊ शकतात. ज्यांचा भूखंड २००१ पूर्वीचा आहे व नंतर बांधकाम झाले आहे, अशा नागरिकांचे काय करणार असा प्रश्न महापौरांनी केला. ४खुल्या भूखंडधारकांनी मनपाकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज करावा, ज्यांनी २००१ नंतर बांधकाम केले आहे, त्यांचा प्लॉट गुंठेवारीनुसार नियमित झाला आहे, अशा नागरिकांना साईड मार्जिनचा भाग पाडून बांधकाम नियमित करता येऊ शकते, अशी माहिती फड यांनी दिली. सर्वच पदाधिकाऱ्यांनी २० बाय ३० फुटाच्या प्लॉटमध्ये साईड मार्जिन किती सोडणार आणि बांधकाम किती करणार असा प्रश्न उपस्थित केला.