शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वेळीच काळजी घ्या; मधुमेहाला वयच नाही; लहान मुले, तरुण, ज्येष्ठांनाही गाठतोय

By संतोष हिरेमठ | Updated: November 14, 2024 14:00 IST

जागतिक मधुमेह दिन विशेष;  घाटी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के मधुमेह रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : ठरावीक वयानंतरच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. कारण लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ अशा सर्वांनाच मधुमेह गाठत आहे. प्रत्येकाला हा आजार होण्याचे कारण वेगवेगळे आहे. त्यातून अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, योग्य काळजी घेतली तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आता दुपारचीही ओपीडी सुरू झाली आहे. ओपीडीत मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाते. घाटीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के रुग्ण असतात. तर ३० ते ४५ वर्षे वयोगटाचे १५ टक्के रुग्ण असतात. मधुमेह असलेल्या बालकांवर बालरोग विभागात उपचार होतात.

तरुण वयातच गाठतोय मधुमेहएका अभ्यासात छत्रपती संभाजीनगरसह देशभरात झालेल्या ३५ वर्षांखालील २ लाख २५ हजार ९५५ व्यक्तींच्या तपासणी मोहिमेत मधुमेहाचे प्रमाण तपासले. यातून ३५ वर्षांखालील, ३० वर्षांखालील आणि २५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे १७.९ टक्के, १३.३ टक्के आणि ९.८ टक्के आढळले. मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये याच वयोगटात मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे ४०.१ टक्के, ३१.८ टक्के आणि २६.४ टक्के आढळले. हा अभ्यास तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे दर्शवितो. विशेषत: मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये वयाच्या १८ व्या वर्षापासूनच मधुमेहाची तपासणी करणे आवश्यक ठरते.- डाॅ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ

‘स्लो पाॅयझन’सारखे दुष्परिणाममधुमेह हा ‘स्लो पाॅयझन’सारखे शरीरावर दुष्परिणाम करतो. पुन्हा पुन्हा त्वचेचे फंगल व विविध इन्फेक्शन होणे, लघवीचे इन्फेक्शन होणे, हार्ट अटॅक, किडनी खराब होणे, लकवा, डोळ्याच्या पडद्यावर, पायाच्या नसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ

महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेहीदर महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेही येत आहेत. आजघडीला नोंद असलेल्या बालमधुमेहींची संख्या ही १,३५० झाली आहे. २५ वर्षांखालील तरुणांचाही समावेश आहे. ९० टक्के अंधत्व असलेली १५ वर्षीय मुलगी मधुमेहाच्या सर्व परिस्थितीवर मात करून पुढे जात आहे. बारावीत तिने ९४ टक्के मिळविले.- डाॅ. अर्चना सारडा, बालमधुमेहतज्ज्ञ

वृद्धांची काळजी घ्यावीमधुमेह असलेल्यांचे हिमोग्लोबीन ‘ए१सी’ या चाचणीचे प्रमाण ६ पेक्षा कमी असणे योग्य समजले जाते. परंतु वृद्धांमध्ये मधुमेहाच्या उपचारामुळे हायपोग्लॅसेमिया, रक्तातील साखर कमी होऊन त्याचे दुष्परिणाम होणे, हे अधिक धोकादायक असते. यासाठी अशा व्यक्तींचे हिमोग्लोबिन ‘ए१सी’ हे ७ ते ८ च्या मध्ये असले तरी अधिक कमी करण्याचे प्रयत्न करू नये.- डाॅ. मंगला बोरकर, प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, घाटी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdiabetesमधुमेह