शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाणी सोडण्यास अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे. परंतु काही व्यक्ती वारंवार न्यायालयात धाव घेऊन कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठवावा, अशी मागणी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने राकाँ पक्षाचे सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली असून, त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. मराठवाड्यातील बंधारे, धरणे आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा करताना पाणी आणायचे कोठून? हा यक्ष प्रश्न उभा आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नगर, नाशिकमधील काही व्यक्ती विरोध करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. महामंडळाने १२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या निर्णयास अडथळा निर्माण करुन अपेक्षित पाणी येऊ दिले जात नाही. सदरील याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात न्या.अभय ओक व गडकरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ.अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत जायकवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर १२.८३ पाण्याचे मोजमाप करावे, अशी मागणी केली आहे. मुळा, प्रवरा, निळवंडी, गंगापूर, भंडारदरा या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. पाणी सोडताना मोजमाप सुरू केले तर अपेक्षित पाणी मिळत नाही, त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी आल्यानंतर त्याचे मोजमाप करावे, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (प्रतिनिधी)