शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्यास अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे. परंतु काही व्यक्ती वारंवार न्यायालयात धाव घेऊन कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठवावा, अशी मागणी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने राकाँ पक्षाचे सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली असून, त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. मराठवाड्यातील बंधारे, धरणे आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा करताना पाणी आणायचे कोठून? हा यक्ष प्रश्न उभा आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नगर, नाशिकमधील काही व्यक्ती विरोध करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. महामंडळाने १२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या निर्णयास अडथळा निर्माण करुन अपेक्षित पाणी येऊ दिले जात नाही. सदरील याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात न्या.अभय ओक व गडकरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ.अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत जायकवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर १२.८३ पाण्याचे मोजमाप करावे, अशी मागणी केली आहे. मुळा, प्रवरा, निळवंडी, गंगापूर, भंडारदरा या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. पाणी सोडताना मोजमाप सुरू केले तर अपेक्षित पाणी मिळत नाही, त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी आल्यानंतर त्याचे मोजमाप करावे, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (प्रतिनिधी)