शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

पाणी सोडण्यास अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे

बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे. परंतु काही व्यक्ती वारंवार न्यायालयात धाव घेऊन कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठवावा, अशी मागणी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने राकाँ पक्षाचे सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली असून, त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. मराठवाड्यातील बंधारे, धरणे आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा करताना पाणी आणायचे कोठून? हा यक्ष प्रश्न उभा आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नगर, नाशिकमधील काही व्यक्ती विरोध करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. महामंडळाने १२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या निर्णयास अडथळा निर्माण करुन अपेक्षित पाणी येऊ दिले जात नाही. सदरील याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात न्या.अभय ओक व गडकरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ.अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत जायकवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर १२.८३ पाण्याचे मोजमाप करावे, अशी मागणी केली आहे. मुळा, प्रवरा, निळवंडी, गंगापूर, भंडारदरा या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. पाणी सोडताना मोजमाप सुरू केले तर अपेक्षित पाणी मिळत नाही, त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी आल्यानंतर त्याचे मोजमाप करावे, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (प्रतिनिधी)