शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

साठेबाजांवर कारवाई करा

By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST

औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या

औरंगाबाद : विभागातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. या परिस्थितीत त्याची अजिबात लूट होता कामा नये. म्हणून पुरेसी काळजी घ्या, खते-बियाणांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आज येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. एखादा अधिकारी कुणाला पाठीशी घालत असेल तर त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी मराठवाडा विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी बियाणे आणि खतांची मागणी, उपलब्धता, भरारी पथकांची कारवाई आदींचा जिल्हावार आढावा घेतला. काही जिल्ह्यांचा आढावा सुरू असताना त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. शिवाय नियोजनाचा अभावही दिसून आला. या कारणावरून देशमुख यांनी अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, खरीप हंगामाच्या दृष्टीने मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वच जिल्ह्यांत खते आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. कुठेही बियाणे किंवा खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीनचीच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यादृष्टीनेही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. यंदा पुरेसा पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून आपत्कालीन नियोजन केले आहे. पावसाचा खंड पडला तर काय करावे, दुबार पेरणीची गरज भासली तर कोणत्या गोष्टी करायच्या याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हानिहाय आराखडे तयार केले आहेत, असेही देशमुख म्हणाले. बैठकीला औरंगाबाद प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी भीमराव कुलकर्णी यांच्यासह आठही जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदांचे जिल्हा कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक आदी अधिकारी हजर होते.