शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

गरजेनुसार उपाययोजना आखा

By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात. शिवाय, प्रादेशिकस्तरावर काही योजना मंजुरीसाठी असतील, तर त्याचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी रविवारी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी व पाणीटंचाईच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दांगट म्हणाले, विहिरी, विंधन विहिरी व अन्य अधिग्रहण करताना त्या गावांत कोणती गरज आहे, याचा आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार त्या गावातील पाणीटंचाईचे निवारण करावे. नाला सरळीकरण, खोलीकरण करण्यासाठी शासनाकडे यंत्र उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे जून अखेरपर्यंत गाळ काढण्याचे नियोजन करावे. काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार अभियान, पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कृषी विभागाच्या जलसिंचन योजना प्रभावीपणे राबवून पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अपर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २०२ गावांचा समावेश आहे. या गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींना अभियानात सहभागी करून योजनांची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी योजना राबविण्यासाठी सर्व स्तरातील लोकांसोबत समन्वय साधावा. पाणलोट क्षेत्र विकास हा मुख्य उद्देश असून, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची मूळ संकल्पना समजावून घेऊन कामे तात्काळ सुरू करावीत. तलावातील तसेच जलस्त्रोतांतील गाळ काढणे व काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना देणे हे या अभियानात अभिप्रेत आहे. अभियानातील कामे पारदर्शक होण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.