शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गरजेनुसार उपाययोजना आखा

By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात. शिवाय, प्रादेशिकस्तरावर काही योजना मंजुरीसाठी असतील, तर त्याचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी रविवारी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी व पाणीटंचाईच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दांगट म्हणाले, विहिरी, विंधन विहिरी व अन्य अधिग्रहण करताना त्या गावांत कोणती गरज आहे, याचा आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार त्या गावातील पाणीटंचाईचे निवारण करावे. नाला सरळीकरण, खोलीकरण करण्यासाठी शासनाकडे यंत्र उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे जून अखेरपर्यंत गाळ काढण्याचे नियोजन करावे. काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार अभियान, पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कृषी विभागाच्या जलसिंचन योजना प्रभावीपणे राबवून पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अपर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २०२ गावांचा समावेश आहे. या गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींना अभियानात सहभागी करून योजनांची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी योजना राबविण्यासाठी सर्व स्तरातील लोकांसोबत समन्वय साधावा. पाणलोट क्षेत्र विकास हा मुख्य उद्देश असून, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची मूळ संकल्पना समजावून घेऊन कामे तात्काळ सुरू करावीत. तलावातील तसेच जलस्त्रोतांतील गाळ काढणे व काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना देणे हे या अभियानात अभिप्रेत आहे. अभियानातील कामे पारदर्शक होण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.