शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

सातार्‍यात पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: May 31, 2014 01:24 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असून, सध्या चालू असलेल्या ६ टँकरच्या फेर्‍याही अपूर्णच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. गतवर्षी या भागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मनपाच्या जलवाहिनीवरून शुद्ध पाणी पुरविले जात होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन टँकर परिसरात फेर्‍या मारत असून, पाणीपुरवठ्यावर मात करण्याचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहे. सातारा परिसरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना कार्यालयास दांडी मारून चार ते पाच दिवसांआड पाणी भरणे शक्य नसल्याने खाजगी टँकरच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे. एका कॉलनीतील घराला पाणी देताना १६ टँकरला तीन ते चार दिवसांचा गॅप पडत होता; परंतु यंदा शासनाकडे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन फेब्रुवारीतच पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. त्या मागणीकडे अधिकार्‍यांनी सतत दुर्लक्ष करून गत महिन्यात ३ व ४ दिवसांपूर्वी ३, असे सहा टँकर सुरू केले आहेत. प्रत्येक टँकरच्या तीन फेर्‍या असा दिनक्रम ठरविण्यात आला असून, खाजगी टँकरवाले पाण्याचा उपसा करून त्याची सर्रास विक्री करतात अन् शासकीय टँकरला मात्र जेमतेम फेर्‍या मिळत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव टँकर अद्यापही देण्यात आलेले नाहीत. सातार्‍यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, टँकरसाठी तहसीलवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल शिरसाट, नीलेश चाबुकस्वार, राहुल रगडे, विजय पैठणे, विश्वलता शिरसाट, आरती पाटील, लीना बनसोडे, आयुब शेख यांनी दिला.