शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

सातार्‍यात पाण्यासाठी टाहो

By admin | Updated: May 31, 2014 01:24 IST

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत

औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असून, सध्या चालू असलेल्या ६ टँकरच्या फेर्‍याही अपूर्णच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. गतवर्षी या भागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मनपाच्या जलवाहिनीवरून शुद्ध पाणी पुरविले जात होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन टँकर परिसरात फेर्‍या मारत असून, पाणीपुरवठ्यावर मात करण्याचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहे. सातारा परिसरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना कार्यालयास दांडी मारून चार ते पाच दिवसांआड पाणी भरणे शक्य नसल्याने खाजगी टँकरच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे. एका कॉलनीतील घराला पाणी देताना १६ टँकरला तीन ते चार दिवसांचा गॅप पडत होता; परंतु यंदा शासनाकडे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन फेब्रुवारीतच पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. त्या मागणीकडे अधिकार्‍यांनी सतत दुर्लक्ष करून गत महिन्यात ३ व ४ दिवसांपूर्वी ३, असे सहा टँकर सुरू केले आहेत. प्रत्येक टँकरच्या तीन फेर्‍या असा दिनक्रम ठरविण्यात आला असून, खाजगी टँकरवाले पाण्याचा उपसा करून त्याची सर्रास विक्री करतात अन् शासकीय टँकरला मात्र जेमतेम फेर्‍या मिळत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव टँकर अद्यापही देण्यात आलेले नाहीत. सातार्‍यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, टँकरसाठी तहसीलवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल शिरसाट, नीलेश चाबुकस्वार, राहुल रगडे, विजय पैठणे, विश्वलता शिरसाट, आरती पाटील, लीना बनसोडे, आयुब शेख यांनी दिला.