शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

धोकादायक इमारतींच्या ‘संचिकांची’ टेबलवारी

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या वाढली आहे. त्या इमारतींचा मुद्दा दरवर्षी पावसाळ्यात चर्चेला येतो.

औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या वाढली आहे. त्या इमारतींचा मुद्दा दरवर्षी पावसाळ्यात चर्चेला येतो. इमारती पडण्याचा ‘धोका’ कायम आहे. १ महिन्यापासून त्या इमारतींची संचिका अधिकाऱ्यांच्या टेबलवरून फिरते आहे. दुर्दैवी घटना घडण्याची पालिका प्रशासन वाट पाहत असल्याचे यातून दिसते आहे. गेल्या वर्षी ४० पर्यंत असलेला धोकादायक इमारतींचा आकडा यावर्षी ७५ पर्यंत गेला आहे. मागील वर्षात फक्त ६ इमारतींना पालिका प्रशासकीय विभागाने कुलूप लावले आहे. उर्वरित इमारती भाडेकरू आणि मालक यांच्या वादामुळे रिकाम्या करून घेता आल्या नाहीत. त्यामुळे इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. अंदाजे ५०० नागरिक या इमारतींमधून राहत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केले. धोकादायक का?इमारती जुन्या झाल्यामुळे पावसाळ्यात, हलक्या भूकंपाने किंवा गॅस सिलिंडरच्या स्फोटानेही भुईसपाट होऊ शकतात. यात मनुष्य हानीही होऊ शकते. त्यामुळे त्या इमारती रिकाम्या करून घेणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात जुन्या इमारतींच्या भिंती कोसळण्याच्या घटना वरील उल्लेखित भागांमध्ये घडतात. गेल्या आठवड्यात शहागंजमधील एका जुन्या इमारतीचा काही भाग खाली पडला होता. इमारतींचा परिसरशहरातील जुन्या भागात धोकादायक इमारती आहेत. यामध्ये गुलमंडी, कासारीबाजार, रंगारगल्ली, दिवाण देवडी, सिटीचौक, राजाबाजार, शहागंज, पानदरिबा, औरंगपुरा, दलालवाडी, चुनाभट्टी, पैठणगेट या भागांमध्ये जुन्या इमारती असल्याचा अहवाल पालिकेने तयार केला आहे. इमारतींचे वयोमान जुन्या इमारतींचे वयोमान १०० वर्षांहून अधिक आहे. जुने बांधकाम लाकूड, माती, चुना वापरून करण्यात आले आहे. त्यांची उभे राहण्याची क्षमता संपली आहे. शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये त्या इमारती आहेत. त्यामुळे त्या रिकाम्या कराव्यात, असे शासनाचे आदेश पालिकेला आहेत. प्रशासनाचे म्हणणे...प्रशासकीय सूत्र म्हणाले, शहर अभियंत्यांकडे धोकादायक इमारतींप्रकरणी संचिका पाठविली आहे. ४० पर्यंतचा आकडा गेल्या वर्षी होता. यावर्षी इमारतींची संख्या वाढल्याचा अंदाज आहे. इमारत प्रकरणात लवकरच कारवाई करण्यात येईल.