शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये बदल्यांचे सत्र

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत.

औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या ३१ मेपूर्वीच कराव्यात, असे नियम केले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या १९६ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी रात्री ८.३० वाजता जारी केले. बदल्या करताना प्रशासकीय कामकाज सोयीचे कसे होईल आणि जनतेची कामे मार्गी कसे लागतील हे पाहिले जाते. बदल्यांमध्ये घोळ होऊ नये, यासाठी आरोग्य संचालकांनी बदल्यांसाठी पात्र कर्मचार्‍यांची यादी घेऊन आरोग्य उपसंचालक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपिक यांना मुंबईला बोलवले होते. त्यानुसार हे अधिकारी दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता १९६ अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले. या बदल्यांमध्ये ६५ अधिपरिचारिका, २१ अधिसेविका, १९ कनिष्ठ लिपिक, १६ औषधनिर्माता अधिकारी यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या मराठवाड्यातील १४ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने आज बदल्यांचे आदेश जारी केले. आर. एम. साळोख यांची औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागात बदली झाली आहे. केज तहसीलमधील पी. डी. पुरी यांची बदली शिरूर अनंतपाळ येथे, के. एच. जगरवाल यांची गेवराई तहसील येथून पाटोदा येथे, लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बी. पी. पन्हाळे यांची महसूल शाखेतून याच ठिकाणी रोहयो शाखेत, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. बी. यंदे यांची पुरवठा विभागातून याच ठिकाणी रोहयो शाखेत, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील पी. डी. जाधव यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात, बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लक्ष्मण धस यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात, एस. सी. पाचपुते यांची माजलगाव तहसील कार्यालयातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात, के. पी. नरवडे यांची परतूर तहसील कार्यालयातून सिल्लोड तहसील कार्यालयात, शिवानंद बिडवे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, व्ही. डी. पाटोळे यांची सोनपेठ येथून मंठा तहसील कार्यालयात, पी. बी. सिरसेवाड यांची माजलगाव येथून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, डी. बी. कोरडे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून वैजापूर येथे आणि डी. के. संतपाळ यांची वैजापूर येथून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.