शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 19:10 IST

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनापूर्वी एका आजाराने आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्यांना बेजार केले होते. तो आजार म्हणजे स्वाइन फ्लू. दहा वर्षांपूर्वी या आजाराचे नाव काढले तरी अनेकांना घाम फुटायचा. मात्र, आता स्वाइन फ्लूचे रुग्ण समोर येणे बंद झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दहशत पसरविणाऱ्या कोरोनाचीही नंतर अशीच अवस्था होईल, अशी शक्यता नाकारता येणार नाही.

देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१० मध्येही हे प्रमाण काही प्रमाणात सारखेच होते. त्यानंतर २०११ मध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यानंतर एक वर्षाची विश्रांती घेऊन २०१२ मध्ये स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. १० वर्षांनंतर म्हणजे मार्च २०२० मध्ये कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाच्या विषाणूत सतत बदल होत आहे. परिणामी, तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, यापुढे कोरोनाचीही स्थितीही स्वाइन फ्लूप्रमाणे होते का, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात तेव्हा काय होती स्थितीराज्यात २०१० ते २०१७ दरम्यान अनेकांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. सर्वाधिक मृत्यू पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांत झाले. तेव्हाही ६० टक्के मृत्यू हे २१ ते ५० या वयातील व्यक्तींचे झाल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाने स्वाइन फ्लूपेक्षा अधिक कहर केला आहे.

औरंगाबाद विभागातील स्वाइन फ्लूची स्थितीऔरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यात २०१८ मध्ये एकूण ५१, सन २०१९ मध्ये ९६ आणि सन २०२० मध्ये ६ स्वाइन फ्लूच रुग्ण आढळले होते, तर सन २०२१ ते आतापर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती या कार्यालयातर्फे देण्यात आली.

साथ संपण्याची प्रतीक्षासध्या स्वाइन फ्लूचे रुग्ण नाहीत. विषाणूजन्य आजार कधी कमी, तर कधी जास्त होत असतात. कोरोनाचे पुढे काय होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. साथ संपल्यानंतरच सगळे स्पष्ट होईल.- डाॅ. सुनील गायकवाड, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद