शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ऐन सणासुदीत मिठाईची गोडी फिक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की ...

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की झाली आहे. या भाववाढीसाठी साखर, दूध, कच्चामाल तसेच डिझेलच्या भावात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गत वर्षभरात महागाईने सर्वसामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. आता महागाईचे पाणी डोक्यावरुन वाहू लागले आहे. सणासुदीचे दिवस आहेत. मिठाईला मागणी वाढत असताना दुसरीकडे किलोमागे २० ते ४० रुपयांनी मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहे.

दूध, खव्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. यात पेढा, बर्फी, बालूशाही, गुलाबजामून आदी मिठाईचा समावेश आहे.

चौकट

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मिठाईचे नाव सध्याचे दर गणेशोत्सआधीचे दर

दूधपेढा ५०० रु. ४८० रु.

केशर बर्फी ५०० रु. ५२० रु.

कलाकंद ४८० रु. ५०० रु.

रसमलाई ४०० रु. ४४० रु

------

चौकट

का वाढले दर ?

मिठाई तयार करण्यासाठी दूध, साखर लागते. दूध लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी महागले. सध्या ६० ते ६४ रुपये लिटरने दूध मिळत आहे. साखरचे भाव ४ रुपयाने वधारून ४० रुपये किलो झाले आहे. भट्टीसाठी डिझेल लागते ते आता ९९ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे नाईलाजाने मिठाईचे दर किलोमागे २० ते ४० रुपयांनी वाढवावे लागले.

राजेंद्र पवार

मिठाई विक्रेते

---

दूध, साखर, डिझेलचे भाव वाढले तसेच कारागिरांची मजुरी वाढली आहे. यासर्वांचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. मात्र, छावणीत कामगार, रोजंदारीने काम करणारा वर्ग जास्त असल्याने व तोच ग्राहक जास्त प्रमाणात असल्याने आम्ही भाववाढ केली नाही. नफा कमी झाला पण ग्राहक टिकवून ठेवला.

दिनेश कच्छवा

मिठाई विक्रेता

--

दरांवर नियंत्रण कोणाचे ?

मिठाईच्या दरावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. अन्न व औषधविभाग फक्त गुणवता तपासणी करीत असते. कच्चामालाचे भाव वाढले की, शहरातील मिठाई विक्रेते आपआपसात ठरवून वाढ करतात.

---

भेसळीकडे लक्ष असू द्या

१) शहरात अनेक मिठाई विक्रेते स्वत: खवा तयार करतात व खव्याचे पेढे व अन्य मिठाई बनवितात.

२) मात्र, परप्रांतातून खवा आणून येथे मिठाई तयार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. खव्याची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते.

३) अनेकदा पोत्यात टाकून खवा आणला जातो. त्याची गुणवत्ता खराब होते. सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त खवा परराज्यातून जास्त प्रमाणात मागविला जात असतो.

---

चौकट

ग्राहक म्हणतात

आधीच महागाईचे पाणी डोक्यावरून चालले आहे. त्यात आता मिठाई महागल्याने सणासुदीत गोड खाणेही आता परवडत नाही. किलोमागे २० ते ४० रुपये भाववाढ होणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

विलास तोडकर

ग्राहक, सिडको

---

आता महागाईची सवय झाली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाववाढीने सर्वच महागले. त्यातून मिठाई कशी सुटणार. तसेही आम्ही सणाच्या दिवशी अर्धा ते एक किलो मिठाई खरेदी करतो.

आर्य माहेश्वरी

समर्थनगर

---