शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

ऐन सणासुदीत मिठाईची गोडी फिक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की ...

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की झाली आहे. या भाववाढीसाठी साखर, दूध, कच्चामाल तसेच डिझेलच्या भावात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गत वर्षभरात महागाईने सर्वसामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. आता महागाईचे पाणी डोक्यावरुन वाहू लागले आहे. सणासुदीचे दिवस आहेत. मिठाईला मागणी वाढत असताना दुसरीकडे किलोमागे २० ते ४० रुपयांनी मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहे.

दूध, खव्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. यात पेढा, बर्फी, बालूशाही, गुलाबजामून आदी मिठाईचा समावेश आहे.

चौकट

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मिठाईचे नाव सध्याचे दर गणेशोत्सआधीचे दर

दूधपेढा ५०० रु. ४८० रु.

केशर बर्फी ५०० रु. ५२० रु.

कलाकंद ४८० रु. ५०० रु.

रसमलाई ४०० रु. ४४० रु

------

चौकट

का वाढले दर ?

मिठाई तयार करण्यासाठी दूध, साखर लागते. दूध लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी महागले. सध्या ६० ते ६४ रुपये लिटरने दूध मिळत आहे. साखरचे भाव ४ रुपयाने वधारून ४० रुपये किलो झाले आहे. भट्टीसाठी डिझेल लागते ते आता ९९ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे नाईलाजाने मिठाईचे दर किलोमागे २० ते ४० रुपयांनी वाढवावे लागले.

राजेंद्र पवार

मिठाई विक्रेते

---

दूध, साखर, डिझेलचे भाव वाढले तसेच कारागिरांची मजुरी वाढली आहे. यासर्वांचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. मात्र, छावणीत कामगार, रोजंदारीने काम करणारा वर्ग जास्त असल्याने व तोच ग्राहक जास्त प्रमाणात असल्याने आम्ही भाववाढ केली नाही. नफा कमी झाला पण ग्राहक टिकवून ठेवला.

दिनेश कच्छवा

मिठाई विक्रेता

--

दरांवर नियंत्रण कोणाचे ?

मिठाईच्या दरावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. अन्न व औषधविभाग फक्त गुणवता तपासणी करीत असते. कच्चामालाचे भाव वाढले की, शहरातील मिठाई विक्रेते आपआपसात ठरवून वाढ करतात.

---

भेसळीकडे लक्ष असू द्या

१) शहरात अनेक मिठाई विक्रेते स्वत: खवा तयार करतात व खव्याचे पेढे व अन्य मिठाई बनवितात.

२) मात्र, परप्रांतातून खवा आणून येथे मिठाई तयार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. खव्याची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते.

३) अनेकदा पोत्यात टाकून खवा आणला जातो. त्याची गुणवत्ता खराब होते. सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त खवा परराज्यातून जास्त प्रमाणात मागविला जात असतो.

---

चौकट

ग्राहक म्हणतात

आधीच महागाईचे पाणी डोक्यावरून चालले आहे. त्यात आता मिठाई महागल्याने सणासुदीत गोड खाणेही आता परवडत नाही. किलोमागे २० ते ४० रुपये भाववाढ होणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

विलास तोडकर

ग्राहक, सिडको

---

आता महागाईची सवय झाली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाववाढीने सर्वच महागले. त्यातून मिठाई कशी सुटणार. तसेही आम्ही सणाच्या दिवशी अर्धा ते एक किलो मिठाई खरेदी करतो.

आर्य माहेश्वरी

समर्थनगर

---