शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत मिठाईची गोडी फिक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की ...

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की झाली आहे. या भाववाढीसाठी साखर, दूध, कच्चामाल तसेच डिझेलच्या भावात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गत वर्षभरात महागाईने सर्वसामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. आता महागाईचे पाणी डोक्यावरुन वाहू लागले आहे. सणासुदीचे दिवस आहेत. मिठाईला मागणी वाढत असताना दुसरीकडे किलोमागे २० ते ४० रुपयांनी मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहे.

दूध, खव्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. यात पेढा, बर्फी, बालूशाही, गुलाबजामून आदी मिठाईचा समावेश आहे.

चौकट

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मिठाईचे नाव सध्याचे दर गणेशोत्सआधीचे दर

दूधपेढा ५०० रु. ४८० रु.

केशर बर्फी ५०० रु. ५२० रु.

कलाकंद ४८० रु. ५०० रु.

रसमलाई ४०० रु. ४४० रु

------

चौकट

का वाढले दर ?

मिठाई तयार करण्यासाठी दूध, साखर लागते. दूध लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी महागले. सध्या ६० ते ६४ रुपये लिटरने दूध मिळत आहे. साखरचे भाव ४ रुपयाने वधारून ४० रुपये किलो झाले आहे. भट्टीसाठी डिझेल लागते ते आता ९९ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे नाईलाजाने मिठाईचे दर किलोमागे २० ते ४० रुपयांनी वाढवावे लागले.

राजेंद्र पवार

मिठाई विक्रेते

---

दूध, साखर, डिझेलचे भाव वाढले तसेच कारागिरांची मजुरी वाढली आहे. यासर्वांचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. मात्र, छावणीत कामगार, रोजंदारीने काम करणारा वर्ग जास्त असल्याने व तोच ग्राहक जास्त प्रमाणात असल्याने आम्ही भाववाढ केली नाही. नफा कमी झाला पण ग्राहक टिकवून ठेवला.

दिनेश कच्छवा

मिठाई विक्रेता

--

दरांवर नियंत्रण कोणाचे ?

मिठाईच्या दरावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. अन्न व औषधविभाग फक्त गुणवता तपासणी करीत असते. कच्चामालाचे भाव वाढले की, शहरातील मिठाई विक्रेते आपआपसात ठरवून वाढ करतात.

---

भेसळीकडे लक्ष असू द्या

१) शहरात अनेक मिठाई विक्रेते स्वत: खवा तयार करतात व खव्याचे पेढे व अन्य मिठाई बनवितात.

२) मात्र, परप्रांतातून खवा आणून येथे मिठाई तयार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. खव्याची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते.

३) अनेकदा पोत्यात टाकून खवा आणला जातो. त्याची गुणवत्ता खराब होते. सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त खवा परराज्यातून जास्त प्रमाणात मागविला जात असतो.

---

चौकट

ग्राहक म्हणतात

आधीच महागाईचे पाणी डोक्यावरून चालले आहे. त्यात आता मिठाई महागल्याने सणासुदीत गोड खाणेही आता परवडत नाही. किलोमागे २० ते ४० रुपये भाववाढ होणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

विलास तोडकर

ग्राहक, सिडको

---

आता महागाईची सवय झाली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाववाढीने सर्वच महागले. त्यातून मिठाई कशी सुटणार. तसेही आम्ही सणाच्या दिवशी अर्धा ते एक किलो मिठाई खरेदी करतो.

आर्य माहेश्वरी

समर्थनगर

---