शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

ऐन सणासुदीत मिठाईची गोडी फिक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की ...

औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की झाली आहे. या भाववाढीसाठी साखर, दूध, कच्चामाल तसेच डिझेलच्या भावात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गत वर्षभरात महागाईने सर्वसामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. आता महागाईचे पाणी डोक्यावरुन वाहू लागले आहे. सणासुदीचे दिवस आहेत. मिठाईला मागणी वाढत असताना दुसरीकडे किलोमागे २० ते ४० रुपयांनी मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहे.

दूध, खव्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. यात पेढा, बर्फी, बालूशाही, गुलाबजामून आदी मिठाईचा समावेश आहे.

चौकट

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मिठाईचे नाव सध्याचे दर गणेशोत्सआधीचे दर

दूधपेढा ५०० रु. ४८० रु.

केशर बर्फी ५०० रु. ५२० रु.

कलाकंद ४८० रु. ५०० रु.

रसमलाई ४०० रु. ४४० रु

------

चौकट

का वाढले दर ?

मिठाई तयार करण्यासाठी दूध, साखर लागते. दूध लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी महागले. सध्या ६० ते ६४ रुपये लिटरने दूध मिळत आहे. साखरचे भाव ४ रुपयाने वधारून ४० रुपये किलो झाले आहे. भट्टीसाठी डिझेल लागते ते आता ९९ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे नाईलाजाने मिठाईचे दर किलोमागे २० ते ४० रुपयांनी वाढवावे लागले.

राजेंद्र पवार

मिठाई विक्रेते

---

दूध, साखर, डिझेलचे भाव वाढले तसेच कारागिरांची मजुरी वाढली आहे. यासर्वांचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. मात्र, छावणीत कामगार, रोजंदारीने काम करणारा वर्ग जास्त असल्याने व तोच ग्राहक जास्त प्रमाणात असल्याने आम्ही भाववाढ केली नाही. नफा कमी झाला पण ग्राहक टिकवून ठेवला.

दिनेश कच्छवा

मिठाई विक्रेता

--

दरांवर नियंत्रण कोणाचे ?

मिठाईच्या दरावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. अन्न व औषधविभाग फक्त गुणवता तपासणी करीत असते. कच्चामालाचे भाव वाढले की, शहरातील मिठाई विक्रेते आपआपसात ठरवून वाढ करतात.

---

भेसळीकडे लक्ष असू द्या

१) शहरात अनेक मिठाई विक्रेते स्वत: खवा तयार करतात व खव्याचे पेढे व अन्य मिठाई बनवितात.

२) मात्र, परप्रांतातून खवा आणून येथे मिठाई तयार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. खव्याची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते.

३) अनेकदा पोत्यात टाकून खवा आणला जातो. त्याची गुणवत्ता खराब होते. सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त खवा परराज्यातून जास्त प्रमाणात मागविला जात असतो.

---

चौकट

ग्राहक म्हणतात

आधीच महागाईचे पाणी डोक्यावरून चालले आहे. त्यात आता मिठाई महागल्याने सणासुदीत गोड खाणेही आता परवडत नाही. किलोमागे २० ते ४० रुपये भाववाढ होणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.

विलास तोडकर

ग्राहक, सिडको

---

आता महागाईची सवय झाली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाववाढीने सर्वच महागले. त्यातून मिठाई कशी सुटणार. तसेही आम्ही सणाच्या दिवशी अर्धा ते एक किलो मिठाई खरेदी करतो.

आर्य माहेश्वरी

समर्थनगर

---