शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:44 IST

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची काहीली होत असतानाच विजेच्या घोषित-अघोषित भारनियमनाने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८८ पैकी २९ फिडर हे जास्त थकबाकी व वीज वितरण हानीचे आहेत. तिथे सव्वाचार ते पाच तास, तर इतर फिडरवर दीड ते चार तास दोन टप्प्यांत नियोजित लोडशेडिंगचे महावितरणचे परिपत्रक आहे.

विजेची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे ११ कोटी युनिटची मागणी वाढली आहे. सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट असून, शहरात दीड ते पाच तासांचे भारनियमन होत आहे. शुक्रवारी (दि. २२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी होईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

बिल भरल्यास कमी होऊ शकते लोडशेडिंगवीजबिल भरल्यास फिडरची कॅटॅगिरी बदलेल. त्यानुसार लोडशेडिंगही कमी होईल. जिल्ह्यात सर्वाधिक वीज गळती आणि बिलांचा भरणा कमी असलेले जी १, जी २, जी ३ हे फिडर आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

वीज तुटीमुळे अतिरिक्त वीज उपलब्ध करणे आणि मागणी कमी करण्याच्या उपाययोजनांवर अवलंबून सध्याच्या भारनियमनाचे नियोजन केले. विजेच्या तुटीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागते. सध्या पुरवठा वाढण्याची शक्यता दिसत नाही.- डाॅ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

वीजग्राहक म्हणतात...दिलेल्या वेळापत्रकानुसार वीज गेली, तर कामांचे नियोजन होऊ शकते. उकाड्यात दुपारी आणि रात्रीचा वीज पुरवठा खंडित नकोच. पाणी येते त्या वेळेतही वीज जाऊ नये.- श्रीकांत बोरुडे, वीजग्राहक, चिकलठाणा

केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे कामेही होत नाहीत. शिवाय घरात उकाड्यामुळे थांबणेही शक्य होत नाही. वृद्धांसह लहान मुलांचे तर खूप हाल होत आहेत.- देवकी जाधव, वीजग्राहक, अविष्कार कॉलनी

सध्या उपवास सुरू आहेत. रात्री १० ते १ वाजेपर्यंत वीज नव्हती. दुपारीसुद्धा तीन तास वीज खंडित होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.- सय्यद तारीक, वीजग्राहक, जटवाडा

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद