शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:44 IST

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची काहीली होत असतानाच विजेच्या घोषित-अघोषित भारनियमनाने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८८ पैकी २९ फिडर हे जास्त थकबाकी व वीज वितरण हानीचे आहेत. तिथे सव्वाचार ते पाच तास, तर इतर फिडरवर दीड ते चार तास दोन टप्प्यांत नियोजित लोडशेडिंगचे महावितरणचे परिपत्रक आहे.

विजेची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे ११ कोटी युनिटची मागणी वाढली आहे. सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट असून, शहरात दीड ते पाच तासांचे भारनियमन होत आहे. शुक्रवारी (दि. २२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी होईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

बिल भरल्यास कमी होऊ शकते लोडशेडिंगवीजबिल भरल्यास फिडरची कॅटॅगिरी बदलेल. त्यानुसार लोडशेडिंगही कमी होईल. जिल्ह्यात सर्वाधिक वीज गळती आणि बिलांचा भरणा कमी असलेले जी १, जी २, जी ३ हे फिडर आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

वीज तुटीमुळे अतिरिक्त वीज उपलब्ध करणे आणि मागणी कमी करण्याच्या उपाययोजनांवर अवलंबून सध्याच्या भारनियमनाचे नियोजन केले. विजेच्या तुटीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागते. सध्या पुरवठा वाढण्याची शक्यता दिसत नाही.- डाॅ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

वीजग्राहक म्हणतात...दिलेल्या वेळापत्रकानुसार वीज गेली, तर कामांचे नियोजन होऊ शकते. उकाड्यात दुपारी आणि रात्रीचा वीज पुरवठा खंडित नकोच. पाणी येते त्या वेळेतही वीज जाऊ नये.- श्रीकांत बोरुडे, वीजग्राहक, चिकलठाणा

केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे कामेही होत नाहीत. शिवाय घरात उकाड्यामुळे थांबणेही शक्य होत नाही. वृद्धांसह लहान मुलांचे तर खूप हाल होत आहेत.- देवकी जाधव, वीजग्राहक, अविष्कार कॉलनी

सध्या उपवास सुरू आहेत. रात्री १० ते १ वाजेपर्यंत वीज नव्हती. दुपारीसुद्धा तीन तास वीज खंडित होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.- सय्यद तारीक, वीजग्राहक, जटवाडा

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद