शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

घोषित-अघोषित भारनियमनाने फोडला औरंगाबादकरांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:44 IST

वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची काहीली होत असतानाच विजेच्या घोषित-अघोषित भारनियमनाने शहरवासीयांना चांगलाच घाम फोडला आहे. औरंगाबाद शहर मंडलातील ८८ पैकी २९ फिडर हे जास्त थकबाकी व वीज वितरण हानीचे आहेत. तिथे सव्वाचार ते पाच तास, तर इतर फिडरवर दीड ते चार तास दोन टप्प्यांत नियोजित लोडशेडिंगचे महावितरणचे परिपत्रक आहे.

विजेची मागणी व पुरवठा यामध्ये मोठी तूट निर्माण झाली आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई वगळता उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४,५०० ते २५,००० मेगावॅटएवढी मागणी आहे. जिल्ह्यात सुमारे ११ कोटी युनिटची मागणी वाढली आहे. सुमारे २,३०० ते २,५०० मेगावॅट विजेची तूट असून, शहरात दीड ते पाच तासांचे भारनियमन होत आहे. शुक्रवारी (दि. २२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी होईल, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

बिल भरल्यास कमी होऊ शकते लोडशेडिंगवीजबिल भरल्यास फिडरची कॅटॅगिरी बदलेल. त्यानुसार लोडशेडिंगही कमी होईल. जिल्ह्यात सर्वाधिक वीज गळती आणि बिलांचा भरणा कमी असलेले जी १, जी २, जी ३ हे फिडर आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

वीज तुटीमुळे अतिरिक्त वीज उपलब्ध करणे आणि मागणी कमी करण्याच्या उपाययोजनांवर अवलंबून सध्याच्या भारनियमनाचे नियोजन केले. विजेच्या तुटीमुळे इमर्जन्सी लोडशेडिंग करावे लागते. सध्या पुरवठा वाढण्याची शक्यता दिसत नाही.- डाॅ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

वीजग्राहक म्हणतात...दिलेल्या वेळापत्रकानुसार वीज गेली, तर कामांचे नियोजन होऊ शकते. उकाड्यात दुपारी आणि रात्रीचा वीज पुरवठा खंडित नकोच. पाणी येते त्या वेळेतही वीज जाऊ नये.- श्रीकांत बोरुडे, वीजग्राहक, चिकलठाणा

केव्हाही वीज जात आहे. त्यामुळे कामेही होत नाहीत. शिवाय घरात उकाड्यामुळे थांबणेही शक्य होत नाही. वृद्धांसह लहान मुलांचे तर खूप हाल होत आहेत.- देवकी जाधव, वीजग्राहक, अविष्कार कॉलनी

सध्या उपवास सुरू आहेत. रात्री १० ते १ वाजेपर्यंत वीज नव्हती. दुपारीसुद्धा तीन तास वीज खंडित होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.- सय्यद तारीक, वीजग्राहक, जटवाडा

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद