शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य’; चिकलठाण्याने राखली सजीव देखाव्यांची परंपरा

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 27, 2023 13:45 IST

जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा एक भाग असूनही आपला ग्रामीण बाणा चिकलठाण्याने जपला आहे. याची प्रचिती गणेशोत्सवातही दिसून येते. मागील ४० वर्षांची सजीव देखाव्यांची परंपरा आजतगाजत येथील नवपिढीने जपली आहे. यंदा पुतना वध व शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्य हे सजीव देखावे पाहण्यासाठी मंगळवारी सायंक़ाळी पंचक्रोशीतील आबालवृदांची मोठी गर्दी उसळली होती.जुन्या शहरात एकीकडे सजीव देखाव्याची परंपरा लुप्त झाली असताना, चिकलठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मात्र ती टिकवून ठेवली आहे. यांत्रिकी चलदेखाव्याच्या युगात हे सजीव देखावे भाव खाऊन जात आहेत.

पुतना वधजय मल्हार गणेश मंडळास १९९० पासून सजीव देखाव्याची परंपरा आहे. यंदा पुतना वध हा देखावा सादर केला जात आहे. यासाठी २० फूट लांबीची पुतना मावशी तयार केली असून तिचा वध बालकृष्ण करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या देखाव्यात ९ कलाकार काम करीत आहेत. देखावा बघण्यासाठी मागील तीन दिवस मोठी गर्दी उसळली होती.

शिवकालीन स्वराज्य ते आजचे स्वराज्यछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जनजीवन कसे होते आणि आताच्या स्वराज्यात कसे जनजीवन आहे; यातील फरक सजीव देखाव्याच्या माध्यमातून ‘जय मराठा गणेश मंडळा’ने सर्वांसमोर मांडला आहे. दहीहंडे गल्लीतील हा देखावा उत्कृष्ट सजीव देखावा ठरत आहे. १५ मिनिटांच्या देखाव्यात ३५ कलाकार आहेत. यंदा या मंडळाच्या सजीव देखाव्याचे ३१ वे वर्ष आहे.

केदारनाथ देखावा- अलोट गर्दीचिकलठाण्यातील श्री सावता गणेश मंडळाने सजीव देखाव्याची परंपरा खंडित करीत निर्जीव देखाव्याची प्रथा सुरू केली. यंदा केदारनाथ देखावा उभारण्यात आला. शहरातील २ गणेश मंडळांनी यंदा केदारनाथ देखावा उभारला आहे. मात्र, त्या तुलनेत सावता गणेश मंडळाचा देखावा भव्यदिव्य ठरत आहे. तिथे सायंकाळी मोठी गर्दी उसळत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanpati Festivalगणेशोत्सव