शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

स्वच्छ भारत अभियानासाठी भारतभ्रमण

By admin | Updated: June 21, 2015 00:17 IST

जालना : देशात स्वच्छता राहावी यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तांडूर येथील युवक दुचाकीवरुन भारतभ्रमणावर निघाला आहे.

जालना : देशात स्वच्छता राहावी यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तांडूर येथील युवक दुचाकीवरुन भारतभ्रमणावर निघाला आहे. शनिवारी हा युवक जालन्यात आला असता त्यांने ‘लोकमत’ सोबत संवाद साधला. स्वच्छ भारत अभियानासोबतच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये याचाही प्रचार या यात्रेतून केला जात आहे. तांडूर येथील प्रवीणकुमार जल्लू (३०) यांनी ३१ मे पासून भ्रमण सुरु केले आहे. ७ जून रोजी ते कन्याकुमारी येथे पोहचले. त्यानंतर काश्मिर, आसाम, गोवा मार्गे त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. प्रवीणकुमार म्हणाले, आपला देश विविधतेने नटला आहे. मोठी परंपरा आहे. मात्र ठिक ठिकाणी अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी म्हणून ही यात्रा सुरु केली. दिवसाकाठी ३०० किलोमीटर आंतर कापतो. वैयक्तिक संदेश देण्यासोबतच शाळा, महाविद्यालये, निवासी तसेच व्यापारी संकुलांमध्ये जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करत आहे. स्वच्छतेसोबतच स्त्रीभू्रण हत्या रोखण्यासाठी तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये म्हणून जनजागृती करीत आहे. २ आॅक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीदिनी तांडूर येथे या यात्रेचा समारोप करणार असल्याचे प्रवीणकुमार यांनी सांगितले. अधिक माहिती देताना प्रवीणकुमार म्हणाले, कोणतेही लक्ष अथवा उद्देश डोळ्यासमोर नव्हता. पण काहीतरी वेगळे करुन दाखवावे या प्रेरणेनेच ही यात्रा सुुरुवात झाली. आज रोजी पंधरा ते वीस हजार किमी अंतर कापले आहे. अनेक अनुभव आले. मात्र त्रास कोठेही झाला नाही. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करुन देशासाठी काहीतरी वेगळे केले जात आहे. त्यातूनही स्वच्छतेसारखा महत्वाचा संदेश या यात्रेतून दिला जात आहे. याचे लोकांना कौतुक आहे.