शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

बिंदुनामावलीच्या पडताळणीवरच संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:14 IST

प्राथमिक शिक्षण विभागातील ज्या कर्मचाºयांनी चुकीची बिंदुनामावली तयार केली, मागासवर्गीय कक्षाकडून ती प्रमाणित करून घेतली, आता प्रशासनाने पुन्हा त्याच कर्मचाºयांकडे तीच बिंदुनामावली पडताळणीसाठी दिली आहे, त्यामुळे सत्य समोर येईलच कशावरून, असा प्रश्न खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्राथमिक शिक्षण विभागातील ज्या कर्मचाºयांनी चुकीची बिंदुनामावली तयार केली, मागासवर्गीय कक्षाकडून ती प्रमाणित करून घेतली, आता प्रशासनाने पुन्हा त्याच कर्मचाºयांकडे तीच बिंदुनामावली पडताळणीसाठी दिली आहे, त्यामुळे सत्य समोर येईलच कशावरून, असा प्रश्न खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने उपस्थित केला आहे.जि.प. शिक्षण विभागाने विभागीय आयुक्तालयातील मागासवर्गीय कक्षाकडून २ मे २०१६ रोजी प्रमाणित करून घेतलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये खुल्या प्रवर्गातील तब्बल १६६ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. यासंबंधी आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांच्या हाती अनेक पुरावे लागले असून, सदरील शिक्षकांनी यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे जाब विचारला. सातत्याने पाठपुरावाही केला; पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अन्यायग्रस्त खुल्या प्रवर्गातील शिक्षकांनी एकत्र येऊन ‘खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ’ या नावे संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत ग्रामविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. ग्रामविकास विभागाने तक्रारीची ताबडतोब दखल घेतली व एकट्या औरंगाबादच नव्हे, तर राज्यातील परभणी, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांची बिंदुनामावली तपासली जात आहे. तपासणी अंतिम टप्प्यात आली असून, संघटनेने केलेल्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे तपासणी पथकातील कर्मचारी सांगत आहेत. पूर्वी ज्या कर्मचाºयांनी बिंदुनामावलीची मोडतोड केली, आताही तेच कर्मचारी बिंदुनामावलीची तपासणी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे कर्मचारी आपली चूक उघड करतील कशावरून, हा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाºयांना सतावत आहे.या मुद्यांची पडताळणी कोण करणारसन २००५ च्या प्रमाणित बिंदुनामावलीमध्ये अनेक शिक्षक मागास प्रवर्गावर आहेत, तर तेच शिक्षक सन २०१६ च्या बिंदुनामावलीमध्ये खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आलेले आहेत. बिंदुनामावली अद्ययावत करताना मयत, तसेच सेवानिवृत्त शिक्षकांची नावे वगळलेली नाहीत. आंतरजिल्हा बदलीने येथून गेलेल्या खुल्या प्रवर्गातील ५७ शिक्षकांची नावेही वगळण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखविण्यात आले आहे. शिक्षक नियुक्तीचे पुरावे सापडत नाहीत म्हणून अनेक शिक्षक खुल्या प्रवर्गातच दाखविलेले आहेत. अनेक शिक्षकांची निवडसूचीच शिक्षण विभागाकडे नाही. मग, शिक्षण विभागाने बिंदुनामावली कोणत्या आधारे तयार केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. समांतर आरक्षणाद्वारे अन्य प्रवर्गातील निवड केलेल्या शिक्षकांनादेखील सरळ खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवरच दाखविण्यात आलेले आहे.