शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

तडीपारीचे ५७ प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित

By admin | Updated: January 28, 2017 23:43 IST

लातूर ७ गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी़ याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे़

राजकुमार जोंधळे  लातूरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण २४ पोलीस ठाण्यांच्या डायरीवर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ५७ गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी़ याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे़ या प्रस्तावावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत़ लातूर जिल्ह्यात एकूण २४ पोलीस ठाणे कार्यरत आहेत़ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ५८ जिल्हा परिषद मतदार संघ आणि ११६ पंचायत समिती मतदार संघ त्याचबरोबर ६ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे़ विविध पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गणेशोत्सव, नवरात्र आणि निवडणूक काळात पोलिसांकडून कार्यवाही केली जाते़ यातून तडीपारीचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविले जातात़ निवडणूक आणि नवरात्र, गणोशोत्सव काळात या गुन्हेगाराकडून सामाजिक शांतता भाग होण्याचा धोका असतो़ त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वेळ प्रसंगी कोंबिंग आॅपरेशनही केले जाते़ तर काही गुन्हेंगारावर प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या जातात़ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खास बाब म्हणून तसे प्रस्ताव त्या-त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येतात़ गेल्या तीन वर्षांपासून हे प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून सातत्याने दाखल करण्यात आले आहेत़ मात्र या प्रस्तावावर प्रशासनाकडून तातडीने निर्णय घेतला जात नाही़ त्यामुळे गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होत नाही़२०१४ मध्ये पोलीस प्रशासनाकडून ५७ तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ यामध्ये एमआयडीसी लातूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ३, निलंगा ३, उदगीर ८ असे एकूण १४ प्रस्ताव नव्याने दाखल करण्यात आले होते़ त्यानंतर २०१५ मध्ये एमआयडीसी लातूर विभागीय अधिकाऱ्यांकडे २४, निलंगा १०, उदगीर ४, औसा-रेणापूर १, अहमदपूर ४ असे ४५ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते़ या दोन्ही वर्षात काही प्रकरणे निकाली काढण्यात आली़ मात्र प्रलंबित प्रस्तावांची संख्या ५७ ही कायमच राहिली़ पुन्हा २०१६ डिसेंबर अखेरपर्यंतच्या ५७ गुन्हेगारांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आले होते़ यामध्ये लातूर एमआयडीसी उपविभागातून १७, निलंगा ६, उदगीर १०, औसा- रेणापूर ४, अहमदपूर ४ असे ४५ प्रस्ताव दाखल केले होते़ मात्र हे प्रस्तावही अद्याप निर्णयाअभावी प्रलंबित आहेत़ सातत्याने तीन वर्षांपासून ५७ तडीपारीच्या प्रस्तावावर निर्णय झाला नाही़