शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

लोकमत इफेक्ट : वरिष्ठांकडून दखल; सकाळीच अधिका-यांचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककेºहाळा : सिल्लोड तालुक्यातील केºहाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी गावातील वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.केºहाळा येथील हरण बर्डी शिवारातील गट नं. १५५ मध्ये नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. अनेक शिवारांतही ५० वर्षांपासून उजेड नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये कोटेशनही भरले आहे; पण महावितरणने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘आमचे सौभाग्य कधी उजळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून येथील शेतकºयांच्या समस्या उजेडात आणल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत सकाळी ११ वाजताच महावितरणचे सिल्लोड येथील मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार, उप कार्यकारी अभियंता सैवर, उप कार्यकारी अभियंता सुरसे, लाईनमन दत्ता गोराडे, राजेंद्र कुमावत आदींसह त्यांचे पथक हरण बर्डी शिवार गाठून त्यांनी वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पथकाने वीज नसलेल्या घरांचे सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.४केºहाळा ग्रामस्थांना विजेच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. गेल्या महिन्यात तीन वेळा उच्च दाबाने गावात वीजपुरवठा झाल्याने अनेकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. हरण बर्डी शिवारात महावितरणचे पथक आल्याचे कळताच उपसरपंच दत्ता कुडके व चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी रोष व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार यांच्याकडे हट्ट धरला व पथकाला गावातील सर्व फिडरवर घेऊन जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज