शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

लोकमत इफेक्ट : वरिष्ठांकडून दखल; सकाळीच अधिका-यांचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककेºहाळा : सिल्लोड तालुक्यातील केºहाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी गावातील वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.केºहाळा येथील हरण बर्डी शिवारातील गट नं. १५५ मध्ये नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. अनेक शिवारांतही ५० वर्षांपासून उजेड नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये कोटेशनही भरले आहे; पण महावितरणने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘आमचे सौभाग्य कधी उजळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून येथील शेतकºयांच्या समस्या उजेडात आणल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत सकाळी ११ वाजताच महावितरणचे सिल्लोड येथील मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार, उप कार्यकारी अभियंता सैवर, उप कार्यकारी अभियंता सुरसे, लाईनमन दत्ता गोराडे, राजेंद्र कुमावत आदींसह त्यांचे पथक हरण बर्डी शिवार गाठून त्यांनी वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पथकाने वीज नसलेल्या घरांचे सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.४केºहाळा ग्रामस्थांना विजेच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. गेल्या महिन्यात तीन वेळा उच्च दाबाने गावात वीजपुरवठा झाल्याने अनेकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. हरण बर्डी शिवारात महावितरणचे पथक आल्याचे कळताच उपसरपंच दत्ता कुडके व चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी रोष व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार यांच्याकडे हट्ट धरला व पथकाला गावातील सर्व फिडरवर घेऊन जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज