शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांचे महावितरणकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:06 IST

लोकमत इफेक्ट : वरिष्ठांकडून दखल; सकाळीच अधिका-यांचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककेºहाळा : सिल्लोड तालुक्यातील केºहाळा येथील हरण बर्डी शिवारात गेल्या ५० वर्षांपासून वीज पोहोचलीच नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी गावातील वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.केºहाळा येथील हरण बर्डी शिवारातील गट नं. १५५ मध्ये नाथाजी फकिरा सुरडकर यांची एकूण चार एकर शेती, तर गट नंबर १५७ मध्ये हुसेन शेख मोहंमद यांची सहा एकर व गट नंबर १५३ मध्ये सुखदेव रामराव बनकर यांची जमीन आहे. हे कुटुंब १९६८ पासून येथे वास्तव्यास आहेत. तब्बल पन्नास वर्षांचा कालखंड या कुटुंबाचा अंधारातच निघून गेला आहे. अनेक शिवारांतही ५० वर्षांपासून उजेड नाही. या शेतवस्तीवरील लोकांनी २०१० मध्ये कोटेशनही भरले आहे; पण महावितरणने दखल घेतलेली नाही. याप्रकरणी लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘आमचे सौभाग्य कधी उजळणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून येथील शेतकºयांच्या समस्या उजेडात आणल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत सकाळी ११ वाजताच महावितरणचे सिल्लोड येथील मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार, उप कार्यकारी अभियंता सैवर, उप कार्यकारी अभियंता सुरसे, लाईनमन दत्ता गोराडे, राजेंद्र कुमावत आदींसह त्यांचे पथक हरण बर्डी शिवार गाठून त्यांनी वंचित शेतकºयांचे सर्वेक्षण केले. यावेळी अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमच्या पथकाने वीज नसलेल्या घरांचे सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.४केºहाळा ग्रामस्थांना विजेच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. गेल्या महिन्यात तीन वेळा उच्च दाबाने गावात वीजपुरवठा झाल्याने अनेकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. हरण बर्डी शिवारात महावितरणचे पथक आल्याचे कळताच उपसरपंच दत्ता कुडके व चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी रोष व्यक्त करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चेअरमन साहेबराव बांबर्डे यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अधिकार यांच्याकडे हट्ट धरला व पथकाला गावातील सर्व फिडरवर घेऊन जात तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज