शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

बदलीच्या समर्थनार्थ शिक्षक भर उन्हात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:25 IST

ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसारच जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी भर उन्हात आज सोमवारी दुपारी बदली हवी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसारच जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी भर उन्हात आज सोमवारी दुपारी बदली हवी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात वर्षानुवर्षे अवघड क्षेत्रात काम करणारे जिल्हाभरातील शिक्षक- शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे सर्वसाधारण व अवघड असे दोन गट तयार करण्यात आले असून, सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीपात्र समजण्यात आले आहेत. अपंग, विधवा, परित्यक्ता, गंभीर आजारी शिक्षकांना बदलीसाठी प्राधान्य देण्यात आले असून, दूर अंतरावर कार्यरत पती- पत्नी यांना एकत्र करण्याची सुविधा, तसेच वर्षानुवर्षे अवघड (दुर्गम) क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदलीने येण्याची संधी दिली जाणार आहे.या शासन निर्णयानुसार गेल्या वर्षी आॅनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु काही शिक्षकांनी या शासन निर्णयास न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हा प्रत्येक न्यायालयात हा शासन निर्णय बदलीसाठी योग्य आहे, यावर शिक्कामोर्तब करून सर्व याचिका निकाली काढल्या होत्या.न्यायालयीन प्रक्रियेत सहा महिन्यांचा वेळ गेल्यामुळे शासनाने नोव्हेंबर महिन्यात बदली प्रक्रिया स्थगित केली होती. यंदा ५ एप्रिलपासून पुन्हा आॅनलाईन बदली प्रक्रिया सुरू झाली. यंदाही काही शिक्षकांनी पुन्हा बदली प्रक्रियेविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांच्या दबावात येऊन शासनाने बदली प्रक्रिया पुन्हा याहीवर्षी स्थगित करू नये, याकरिता बदली हवी असलेल्या हजारो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढून शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सोमवारी दुपारी २ वाजता हा मोर्चा निघाला. तो सिटीचौक, काळा दरवाजामार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चातील अपंग शिक्षक व महिलांच्या शिष्टमंडळाने विभागीय उपायुक्त विद्या ठाकूर यांना निवेदन सादर केले. मोर्चात सहभागी दिव्यांग शिक्षकांनी मोर्चात सहभागी होऊन बदलीची तीव्रता शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. मोर्चात छापील कागदाची बनवलेली टोपी लक्षवेधी ठरली. मोर्चात महिला शिक्षिका, दुर्गम भागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. मोर्चाचे समन्वयक महेश लबडे, नवनाथ जाधव, पांडुरंग गोर्डे यांनी आभार मानले. प्राथमिक शिक्षक समितीने विभागीय आयुक्तालयाजवळ मोर्चेकरी शिक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Teachers Councilशिक्षक परिषदMorchaमोर्चा