शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आधार केंद्र सहा महिन्यांपासून बंद

By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़ गेवराई तालुक्यातील आधारकार्ड केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़गेल्या तीन वर्षांपासून आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे़ आधारकार्ड हा बँक, मोबाईल सीमकार्ड, रहिवासी आदी ठिकाणी पुरावा म्हणून मागितले जात आहे़ यामुळे अनेकांनी आधारकार्डला प्राधान्य दिले होते़ जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास असून बहुतांश ग्रामीण भागातील लोकांनी आधारकार्ड काढले आहे़ मात्र अनेक ठिकाणी आधारकार्ड काढणे बाकी आहे़ आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी प्रारंभी ५ संस्थांतर्गत केंद्रे स्थापन करण्यात आली होती़ पैकी तीन संस्थांनी आपले काम बंद केल्यानंतर दोन संस्थांचे काम जिल्ह्यात सुरू होते़ या दोन संस्थांनी तालुक्याच्या ठिकाणी आपले केंद्र स्थापन केले होते़ त्याच ठिकाणी नोंदणी केली जायची़ मात्र आता परिस्थिती बदलली आहे़ आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या घटली असल्याने या कंपन्यांनी केंद्र बंद केले असल्याची बाब एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितली़आधारकार्ड केंद्र बंद केल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी अनेक नागरिक, युवक, महिला आधारकार्ड काढणे बाकी आहेत़ अनेक ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जात असल्याने गेवराई शहरातील नागरिक केंद्रावर गेले असता तेथे हे केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे शासनाने आधार केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़विशेष म्हणजे हे आधार नोंदणी केंद्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद आहे़ अनेक वेळा मागणी करूनही आधार नोंदणी केंद्र बंद आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील व गेवराई शहरातील लोकांना नोंदणीसाठी ज्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे तेथे जावे लागत आहे़ बीड शहरातील जवळपास सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत़ यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ हे आधारकार्ड नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़(वार्ताहर)