शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आधार केंद्र सहा महिन्यांपासून बंद

By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़

गेवराई : आधारकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज व पुरावा ग्राह्य धरला जात आहे़ प्रत्येक ठिकाणी याची मागणी केली जात असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत़ गेवराई तालुक्यातील आधारकार्ड केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़गेल्या तीन वर्षांपासून आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे़ आधारकार्ड हा बँक, मोबाईल सीमकार्ड, रहिवासी आदी ठिकाणी पुरावा म्हणून मागितले जात आहे़ यामुळे अनेकांनी आधारकार्डला प्राधान्य दिले होते़ जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास असून बहुतांश ग्रामीण भागातील लोकांनी आधारकार्ड काढले आहे़ मात्र अनेक ठिकाणी आधारकार्ड काढणे बाकी आहे़ आधारकार्ड नोंदणीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी प्रारंभी ५ संस्थांतर्गत केंद्रे स्थापन करण्यात आली होती़ पैकी तीन संस्थांनी आपले काम बंद केल्यानंतर दोन संस्थांचे काम जिल्ह्यात सुरू होते़ या दोन संस्थांनी तालुक्याच्या ठिकाणी आपले केंद्र स्थापन केले होते़ त्याच ठिकाणी नोंदणी केली जायची़ मात्र आता परिस्थिती बदलली आहे़ आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या घटली असल्याने या कंपन्यांनी केंद्र बंद केले असल्याची बाब एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितली़आधारकार्ड केंद्र बंद केल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे़ आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी अनेक नागरिक, युवक, महिला आधारकार्ड काढणे बाकी आहेत़ अनेक ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जात असल्याने गेवराई शहरातील नागरिक केंद्रावर गेले असता तेथे हे केंद्र बंद असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे शासनाने आधार केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़विशेष म्हणजे हे आधार नोंदणी केंद्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद आहे़ अनेक वेळा मागणी करूनही आधार नोंदणी केंद्र बंद आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील व गेवराई शहरातील लोकांना नोंदणीसाठी ज्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे तेथे जावे लागत आहे़ बीड शहरातील जवळपास सर्व आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आलेले आहेत़ यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ हे आधारकार्ड नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़(वार्ताहर)