शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

By योगेश पायघन | Updated: September 2, 2022 15:15 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली.

औरंगाबाद :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२) सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने बारावी परीक्षेत राज्यांमध्ये अव्वल तर दहावी परीक्षेत तृतीय स्थान पटकावले. 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेत विभागातून २ हजार २१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी २५ केंद्रांवर परीक्षा दिली. त्यातून ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात आठ विद्यार्थी विशेष श्रेणी, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ५२ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३९.७६ टक्के इतकी आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. यात विभागातून २ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी २१ केंद्रावर २ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातून १ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ४८ टक्के लागला. निकालात औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल स्थानी आला. विशेष श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत ६६, द्वितीय श्रेणीत १४८ तर ९८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणपडताळीसाठी, छायांकित प्रत साठी मिळविण्यासाठी मुदतविद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. गुणपडताळणी ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत तर छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. गुणपडताळणी अर्ज करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद