शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुरवणी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभाग बारावीत राज्यात अव्वल, दहावीत तिसरे

By योगेश पायघन | Updated: September 2, 2022 15:15 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली.

औरंगाबाद :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२) सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने बारावी परीक्षेत राज्यांमध्ये अव्वल तर दहावी परीक्षेत तृतीय स्थान पटकावले. 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेत विभागातून २ हजार २१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी २५ केंद्रांवर परीक्षा दिली. त्यातून ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात आठ विद्यार्थी विशेष श्रेणी, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ५२ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३९.७६ टक्के इतकी आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. यात विभागातून २ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी २१ केंद्रावर २ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातून १ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ४८ टक्के लागला. निकालात औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल स्थानी आला. विशेष श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत ६६, द्वितीय श्रेणीत १४८ तर ९८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणपडताळीसाठी, छायांकित प्रत साठी मिळविण्यासाठी मुदतविद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. गुणपडताळणी ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत तर छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. गुणपडताळणी अर्ज करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद