शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

निवडणुकीत अंधश्रद्धा जोरात

By admin | Updated: April 21, 2015 00:53 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी ५ वा. संपली असली तरी आता अंधश्रद्धाळू राजकारण्यांची जादू आणि छुमंतर करून मतदारांना भुलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी ५ वा. संपली असली तरी आता अंधश्रद्धाळू राजकारण्यांची जादू आणि छुमंतर करून मतदारांना भुलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरील राज्यातील मांत्रिकांना बोलावून वॉर्डांची सीमा बांधणे, तसेच वॉर्डा-वॉर्डांतील धार्मिक स्थळांसमोर हवन करणे, वॉर्डात लिंबू व काळी बाहुली उतरवून फेकण्यासारखे प्रकार आता घडू लागले आहेत. आज दिवसभर समर्थनगर, किराडपुरा, पुंडलिकनगर, गजानननगर, गुलमंडी, बाळकृष्णनगर या वॉर्डांत अंधश्रद्धाळूपणाचे वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळाले. गायी बांधण्यापासून प्रचार कार्यालयात गंडे-दोरे लावणारे उमेदवार या निवडणुकीत पाहावयास मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची पायमल्ली निवडणुकीत झाली आहे. निवडणुकीच्या काळात वेध भविष्याचा, असा जाहीरनामा सादर करणाऱ्या राजकीय पक्षांनीच वेगवेगळे छा...छू...चे प्रयोग करून मतदारांना भुलविण्यात आघाडी घेतली आहे. समर्थनगरमध्ये दोन महाराज पांढरी मोहरी गल्लीबोळांमध्ये फेकत होते. ते कुणासाठी मंत्र भारून ती मोहरी फेकत होते, हे कळू शकले नाही; परंतु प्रचंड मताधिक्य मिळावे, यासाठी मतदारांना केंद्रावर जाताच एकच निशाणी दिसावी, त्या अनुषंगाने मोहरी फेकली जात असल्याचे त्या महाराजांमागे फिरणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले. ज्यांचा विश्वास अशा पद्धतींवर आहे, ते मनपात निवडून आल्यानंतर या शहराच्या विकासाचा महामार्ग कसा शोधणार, असा प्रश्न आहे. एका राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयात तर मोठी काळी बाहुली टांगण्यात आली आहे. पक्षाच्या लोकप्रियतेला कुणाची नजर लागू नये, यासाठी ती बाहुली टांगण्यात आली; परंतु झाले उलटेच. पक्षाला पक्षातील बंडखोरांनीच टांगणीला लावले आहे. कपाळाला गंध कोणता लावायचा, कपडे कोणते घालायचे, मतदारांना कसे बोलायचे, गायीला रोज कोणता नैवेद्य द्यायचा, गल्लीतून जाताना अमुकच दिशेने भस्म फेकायचे, असे अनेक प्रकार या निवडणुकीत पाहावयास मिळाले. बाळकृष्णनगर, समर्थनगर, गुलमंडी वॉर्ड डेंजर झोनमध्ये आहेत. असा प्रश्न एका पक्षाच्या नेत्याला केला असता त्या नेत्याने गमतीदार उत्तर दिले. माझ्याकडे जादूची पुडी आहे. त्या पुडीतील भस्म सगळीकडे पेरले की, माझ्या मर्जीतील सर्व उमेदवार निवडून येतील, असे ते म्हणाले बंडखोरांमुळे सर्व राजकीय पक्षांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे जादूटोण्याचा वापर होत असल्याचे दिसते.