शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

महाराष्ट्राने उन्हाळ्यात फस्त केले २ हजार ५०० कोटींचे आइस्क्रीम, कोणते शहर प्रथम क्रमांकावर?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 12, 2024 16:55 IST

आइस्क्रीम उद्योगासाठी उन्हाळा राहिला ‘सुपर कूल’

छत्रपती संभाजीनगर : यंदाचा उन्हाळा सर्वांत कठीण राहिला... सरासरी पारा ४० ते ४५ अंश दरम्यान जाऊन पोहोचला होता... प्रचंड उकाड्याने जनजीवनही प्रभावित झाले होते... विविध स्वादिष्ट आइस्क्रीमचा आस्वाद घेत शरीर ‘थंडा-थंड कूल कूल’ ठेवले जात होते. उष्णता जेवढी जास्त ते वातावरण आइस्क्रीम उद्योगासाठी ‘सुपर कूल’ ठरते... यामुळेच, मागील चार महिन्यांत महाराष्ट्रात आइस्क्रीम विक्रीत तब्बल २५०० कोटींची उलाढाल झाली. एवढी उलाढाल आजपर्यंतचा उच्चांक मानली जात आहे.

आइस्क्रीम आवडत नाही, असे म्हणणारे लोक खूप दुर्मीळ असतील. आबालवृद्ध आइस्क्रीम दिसले की ते कधी एकदा फस्त करू असेच वाटत असते. जेवढा उन्हाळा कडक, तेवढी आइस्क्रीमची विक्री जास्त हे उद्योगातील गणित ठरलेले आहे. यंदा तसेच घडले. कोरोना काळात आइस्क्रीम उद्योगाला मोठा फटका बसला होता. मात्र, ते नुकसान भरून काढत हा उद्योग ‘नफ्यात’ आला आहे.

आइस्क्रीम उद्योगातील राज्यातील उलाढालीची वाढती आकडेवारीफेब्रुवारी ते मे महिनावर्ष             उलाढाल२०२२- १२०० कोटी२०२३- १५०० कोटी२०२४- २५०० कोटी

हजार कोटीने उलाढाल वाढलीयंदाचा उन्हाळा सर्वाधिक दाहक ठरला. राज्यातील तापमान ४० ते ४५ अंश दरम्यान राहिले. याचा फायदा आइस्क्रीम उद्योगाला झाला. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत २५०० कोटींची उलाढाल झाली, जी मागील वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

कोरोना काळात एक हजार कोटींचा फटकामहाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाला वर्ष २०२१ मध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.

राज्यात किती आइस्क्रीम उद्योगमहाराष्ट्र राज्यात आजघडीला लहान-मोठे आइस्क्रीमच्या ३५० कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल ५० लाखांपासून कोट्यवधीपर्यंतची आहे.

आइस्क्रीम विक्रीत पुणे नंबर वनराज्यात सर्वाधिक आइस्क्रीम पुण्यात विक्री होते. त्यापाठोपाठ मुंबई, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरचा नंबर लागतो.

वार्षिक उलाढाल तीन हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची आशापूर्वी हंगामातच आइस्क्रीम खाल्ले जात होते, पण आता वर्षभर आइस्क्रीमची विक्री होते. हंगामात राज्यात २५०० कोटींची उलाढाल झाली आहे. संपूर्ण वर्षभरात तीन हजार कोटींपर्यंत आइस्क्रीमची उलाढाल पोहोचेल. राज्यात आइस्क्रीमचे उत्पादन होते, याशिवाय गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही आइस्क्रीम विक्रीला येत आहे. दुधापासून आइस्क्रीम बनत असल्याने आइस्क्रीम उद्योगावर १८ टक्के लागणारा जीएसटी कमी करावा, अशी मागणी आहे.अनिल पाटोदी- अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार