शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल : पैठणचे खुले कारागृह राज्यातील सर्व कारागृहांना पुरविते अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:06 IST

संजय जाधव पैठण : १९५७ला प्रदर्शित झालेल्या ‘दो आंखे बारा हात’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाने प्रेरित होऊन जायकवाडी ...

संजय जाधव

पैठण : १९५७ला प्रदर्शित झालेल्या ‘दो आंखे बारा हात’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटाने प्रेरित होऊन जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी कैद्यांच्या बळाचा वापर मजूर म्हणून करण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. त्यातून १९६७ला पैठण येथे खुले कारागृह सुरू करण्यात आले. या कारागृहातील कैद्यांनी जायकवाडीच्या बांधकामात मोठा वाटा उचलला. आज याच कारागृहातील कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून राज्यभरातील कारागृहात अन्नधान्य पुरविले जाते. मुंबई, पुणे मार्केटमध्ये भाजीपाला पाठवला जातो. क्षणिक रागात हातून गुन्हा घडलेल्या कैद्यांना चांगला माणूस बनवून पुन्हा समाजात पाठविण्याची उद्देशपूर्ती खुल्या कारागृहात सफल होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याजवळील औंध संस्थानात, औंधच्या पुरोगामी शासकाने आयरिश मानसशास्त्रज्ञांना खुल्या तुरुंगात ठेवलेल्या धोकादायक गुन्हेगारांवर प्रयोग करण्याची मुभा दिली होती. व्ही. शांताराम यांनी यावर पटकथा तयार करून ‘दो आंखे बारा हात’ या चित्रपटाची निर्मिती केली. पुढे या चित्रपटाने कैद्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होऊन खुल्या कारागृहाची संकल्पना समोर आली. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगार बनू नये म्हणून, तुरुंगात संबंधित कैद्यांवर संस्कार व्हावेत, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला पोट भरता येईल, असे रोजगार प्रशिक्षण त्याला कारागृहात मिळावे, असे विचार विविध समाजशास्त्रज्ञ २०व्या शतकात शासनकर्त्यांसमोर मांडत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पैठणचे भूमिपुत्र कै. शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी धरणाच्या बांधकामासाठी कैद्यांचे बळ उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यातील सर्वात मोठे खुले कारागृह पैठण येथे सुरू झाले.

जायकवाडी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पैठण येथील खुले कारागृह पुढे चालू ठेवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. जायकवाडी धरणासाठी संपादित केलेली ४२९ हेक्टर जमीन करारावर जलसंपदा विभागाकडून कारागृह प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. या जमिनीत कैद्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहातील यंत्रमाग, लोहारकाम, धोबीकाम, सुतारकाम इत्यादी प्रशिक्षण विभागात बरेच बंदी प्रशिक्षित झाले. कारागृहातून सुटल्यानंतर स्वतःचा व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांना याचा उपयोग झाला. कारागृहात गांडूळखत प्रकल्प, सेंद्रिय खत प्रकल्प, कम्पोस्ट खत प्रकल्प राबविण्यात येतात. उत्पादित खत कारागृहाच्या शेतीत वापरण्यात येते. सदर खत कसे तयार करावे, याचे बंदींना प्रशिक्षण देण्यात येते. कारागृह शेतीत वापरून उर्वरित खताची बाजारात विक्री करण्यात येते. या प्रकल्पामुळे बंदी प्रशिक्षणाबरोबर कारागृहास उत्पन्नदेखील मिळते.