शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा ४४ अंशांवर

By admin | Updated: April 16, 2016 23:41 IST

राजकुमार जोंधळे ल्ल लातूर शहर व जिल्ह्यात उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने, सकाळी ११ वाजता घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

राजकुमार जोंधळे ल्ल लातूरशहर व जिल्ह्यात उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याने, सकाळी ११ वाजता घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. परिणामी शहरातील सर्वच रस्त्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाढत्या उन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उन्हाचा पारा कमाल ४४ तर किमान ३४ अंशावर पोहचला आहे. हे तापमान गत पाच वर्षातील सर्वाधिक असल्याची नोंद आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून अल्प पर्जन्यमान आहे. परिणामी दुष्काळासह तीव्र पाणीटंचाईच्या झळा येथील नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. आता उन्हाचा पाराही कमाल ४४ तर किमान ३४ अंशावर गेल्याने घराबाहेर पडणेही कठिण झाले आहे. सकाळी ९ वाजताचा उन्हाचा चटकाही आता सहन होत नाही. दुपारच्या उन्हाचा चटका आणि झळा सहन करण्यापलिकडच्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शनिवापर्यंत नोंद असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या तापमानाला अल्प पर्जन्यमान आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अधिक जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई, शिवाजी चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक आदी भागात दुपारच्या वेळी शुकशुकाट आहे़ शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थीही उन्हापासून बचावासाठी टोपी, रूमालचा वापर करीत आहेत़ शिवाय, उन्हापासून बचावासाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्रीही वाढली आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले आणि वृध्द मंडळींच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. लहान मुलांना दिवसांतून टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी पाजले पाहिजे. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर वृध्द मंडळींनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत करुन, उन्हात फिरणे टाळले पाहिजे. मधूमेह, रक्तदाब आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तिंनी उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी साधने वापरली पाहिजेत. तीव्र उन्हामुळे जुलाब, पचनक्रियेत बिघाड, सतत तहान लागणे आणि ताप, चक्कर येणे आदी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. ओमप्रकाश कदम यांनी सांगितले.उष्णतेच्या लाटेचा परिणाम : जंगलाचे प्रमाण घटले़़़एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार सध्याला उष्णतेची लाट सर्वत्र सुुरु असून, यामुळे उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. परिणामी, सकाळपासूनच घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. पूर्वीच्या निजाम स्टेटमध्ये तेलंगणा आणि मराठवाडा हा कायम दुष्काळी आणि उष्ण तापमानाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. जंगलाचे प्रमाण अल्प असल्याने हा परिणाम आपल्याला जाणवू लागतो. तेलंगणा आणि मराठवाड्याच्या डोंगराळ प्रदेशात या उष्णतेची लाट प्रत्येक वर्षी असते. यामुळे तेलंगणात आजपर्यंत सर्वाधिक उष्मघाताच्या बळीची नोंद असून, आता याचे लोण मराठवाड्यातही पोहचले आहे. शनिवारी उष्मघातामुळे उदगीर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.पाच वर्षांपासून तापमान चिंताजनकलातूर हे उंचवट्यावर आहे, मात्र येथील वाढते तापमान अधिक चिंताजनक आहे. २०१२ मध्ये सर्वात अधिक तापमानाची नोंद झाली होती. या तापमानाच्या आकड्यात वर्षागणिक वाढ झाली असून, यंदा तापमानाचा पारा ४४ अशांवर पोहचला आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक तापमान म्हणून याची नोंद आहे. अर्थात लातूर जिल्ह्यातील तापमान वर्षागणिक वाढत आहे. याला आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड अधिक जबाबदार आहे. जगभरातच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा हा परिणाम असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.