शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उन्हाळी सुटीनिमित्त बसस्थानक, रेल्वेस्थानकात गर्दी

By admin | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. विदर्भ तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुटीनिमित्त अनेक कुटुंबे गावी जातात. सोबतच लग्नतिथी दाट असल्याने जालना बसस्थानकात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे गर्दीने फुलून गेले आहे. प्रवासी भारमान वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवासी भारमान ६८ ते ७० वर गेले आहे. जालना बसस्थानकातून दिवसभरात सरासरी ८० बसेसे धावतात. सुमारे ३० ते ३५ हजार किमीचे अंतर दररोज कपले जात आहे. विशेषत: विदर्भाकडे जाणारी प्रवासी संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात चार बसेस जादा सोडण्यात येत आहे. सोबतच औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेराजा, बीड येथे शटल बस आहे. सोलापूर, पुणेसाठीही बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. जालना मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रवासी भारमान वाढले आहे. जालना आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे म्हणाले, औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेडा राजा, बीड, बुलडाणा, सोलापूर विदर्भासाठी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता बसेस सोबतच फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लग्नासाठी आगाऊ बसेसची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात वीस पेक्षा अधिक बसेसची नोंदणी होण्याचा विश्वास महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.