शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील घरकुलांसाठी साडेअठरा कोटींचा निधी

By admin | Updated: August 24, 2014 00:30 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

अभिमन्यू कांबळे, परभणीराजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील सहा ‘क’ वर्ग नगरपालिकांमध्येही घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांकरीता राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना राबविण्यात येते़ या योजनेचे नाव बदलण्यात आले असून, आता ही योजना ‘राजीव गांधी घरकूल योजना’ या नावाने ओळखली जाणार आहे़ या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, क वर्ग नगरपालिकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे़ या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २०१२-१३ या वर्षाकरीता जिल्ह्याला १ हजार ४४० लाभार्थ्याकरीता १३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ तसेच २०१४-१५ या वर्षाकरीता ४२१ लाभार्थ्यांसाठी ३ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत प्रतिघरकूल ९५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार असून, त्यामध्ये ५ हजार रुपयांचा वाटा लाभार्थ्यांना भरावयाचा आहे़ याशिवाय या योजनेमध्ये पहिल्यांदाच राज्यातील क वर्ग नगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यानुसार या नगरपालिका क्षेत्रातील प्रति घरकुलांकरीता १ लाख ५० हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये १ लाख ३८ हजार ७५० रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे़ तर उर्वरित ११ हजार २५० रुपये लाभार्थ्यांना आपला हिस्सा भरावयाचा आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६८ लाभार्थ्यांकरीता ९४ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ त्यामध्ये जिंतूर शहरातील १४ लाभार्थ्यांकरीता १९ लाख ४२ हजार ५०० रुपये, मानवत शहरातील १० लाभार्थ्याकरीता १३ लाख ८७ हजार ५०० रुपये, पाथरी शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, पूर्णा शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, सेलू शहरातील १५ लाभार्थ्याकरीता २० लाख ८१ हजार २५० रुपये, सोनपेठ शहरातील ५ लाभार्थ्यांकरीता ६ लाख ९३ हजार ७५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगरपालिका देण्यात येणार आहे़ दरम्यान, राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घराचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे़ या योजनेची काटेकोर व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे लाभार्थ्याचे मत आहे़