शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यातील घरकुलांसाठी साडेअठरा कोटींचा निधी

By admin | Updated: August 24, 2014 00:30 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

अभिमन्यू कांबळे, परभणीराजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्याला २०१२-१३, २०१४-१५ या वर्षाकरीता एकूण १८ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ यामध्ये जिल्ह्यातील सहा ‘क’ वर्ग नगरपालिकांमध्येही घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांकरीता राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना राबविण्यात येते़ या योजनेचे नाव बदलण्यात आले असून, आता ही योजना ‘राजीव गांधी घरकूल योजना’ या नावाने ओळखली जाणार आहे़ या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, क वर्ग नगरपालिकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे़ या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २०१२-१३ या वर्षाकरीता जिल्ह्याला १ हजार ४४० लाभार्थ्याकरीता १३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ तसेच २०१४-१५ या वर्षाकरीता ४२१ लाभार्थ्यांसाठी ३ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत प्रतिघरकूल ९५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार असून, त्यामध्ये ५ हजार रुपयांचा वाटा लाभार्थ्यांना भरावयाचा आहे़ याशिवाय या योजनेमध्ये पहिल्यांदाच राज्यातील क वर्ग नगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे़ त्यानुसार या नगरपालिका क्षेत्रातील प्रति घरकुलांकरीता १ लाख ५० हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये १ लाख ३८ हजार ७५० रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे़ तर उर्वरित ११ हजार २५० रुपये लाभार्थ्यांना आपला हिस्सा भरावयाचा आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६८ लाभार्थ्यांकरीता ९४ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ त्यामध्ये जिंतूर शहरातील १४ लाभार्थ्यांकरीता १९ लाख ४२ हजार ५०० रुपये, मानवत शहरातील १० लाभार्थ्याकरीता १३ लाख ८७ हजार ५०० रुपये, पाथरी शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, पूर्णा शहरातील १२ लाभार्थ्याकरीता १६ लाख ६५ हजार रुपये, सेलू शहरातील १५ लाभार्थ्याकरीता २० लाख ८१ हजार २५० रुपये, सोनपेठ शहरातील ५ लाभार्थ्यांकरीता ६ लाख ९३ हजार ७५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगरपालिका देण्यात येणार आहे़ दरम्यान, राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला असल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घराचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे़ या योजनेची काटेकोर व तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे लाभार्थ्याचे मत आहे़