शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

अस्मानीनंतर आता बळीराजावर येणार सुलतानी संकट

By admin | Updated: May 19, 2016 00:09 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले आहे

सुनील कच्छवे, औरंगाबाददुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा बियाणांच्या दरवाढीचेही संकट कोसळले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यंदा तूर, मूग, उडीद, सोयाबीन या कडधान्यांसह ज्वारी आणि बाजरीच्या बियाणांच्या किमतीतही जबर वाढ केली आहे. तुरीचे बियाणे तब्बल ७५ टक्क्यांनी तर उडदाचे दुपटीने महागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च वाढणार आहे. दुष्काळी परिस्थितीत खरिपाच्या पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे. त्यातच आता महाबीजने आपल्या बियाणांच्या किमतीत भरीव वाढ केली आहे. खरिपाच्या तोंडावर नुकतेच महाबीजचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे; परंतु दरवाढीमुळे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बियाणांच्या किमती पाहून धक्का बसत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीच्या दरात सरासरी ७५ टक्के, ज्वारीच्या दरात सरासरी ३५ टक्के, बाजरीच्या दरात ५ टक्के, मुगाच्या दरात ५० टक्के, सोयाबीनच्या दरात ५ टक्के वाढ केली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून राज्यात कडधान्यांच्या क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र, या कडधान्यांच्या किमतीतच महामंडळाने वाढ केली आहे. बियाणे महामंडळ हा राज्य सरकारचाच उपक्रम आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बियाणांच्या किमतीत वाढ झाल्यामुुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मराठवाड्यात कडधान्य पिकांचे दहा लाख हेक्टर क्षेत्र मराठवाड्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४९ लाख ९ हजार हेक्टर इतके आहे. त्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र हे १० लाख ६४ हजार हेक्टर इतके आहे. कडधान्य पिकांमध्ये मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, मूग आणि उडदाचे प्रमाण अधिक आहे. नेमक्या याच पिकांच्या बियाणांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा तुरीचे क्षेत्र ५ लाख ८७ हजार हेक्टर, मुगाचे २ लाख १८ हजार हेक्टर आणि उडदाचे क्षेत्र १ लाख ९९ हजार हेक्टर इतके प्रस्तावित करण्यात आलेले आहे. बियाणे निर्मितीसाठी महामंडळ शेतकऱ्यांकडूनच चांगल्या प्रतीच्या मालाची खरेदी करते. त्याकरिता शेतकऱ्यांना बाजारभाव आणि त्यावर २५ टक्के बोनस दिला जातो. त्यानंतर या मालावर प्रक्रिया करणे, त्याची वाहतूक, चाळणी, गाळणी, पॅकिंग या सर्वांचा खर्च काढून बियाणांची किंमत निश्चित केली जाते. हा सर्व खर्च वाढल्यामुळे यंदा बियाणांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. - जगदीश गिरी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज