शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सुजलाम् सुफलाम्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:48 IST

राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे. दोन वर्षांत ३६१ गावांत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एक लाख, ८७ हजार २७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर विहिरींच्या पाणीपातळीत चार मीटरने वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१५-१६ मध्ये अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये सिमेंट नाला बांधाची ४४२, नाला खोलीकरणाची ५९६ कामे पूर्ण करण्यात आली. तर तीस हजार ४७६ हेक्टरवर बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली.निवडलेल्या गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून १०४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी झालेल्या या कामांना पावसाची चांगली साथ मिळाली. परिणामी विविध जलस्रोतांमध्ये ४९५५० टीसीएम एवढा जलसाठा झाला आहे.या पाण्याचा दोन संरक्षित सिंचनासाठी वापर केल्यास एक लाख ३४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. अभियानाच्या दुसºया टप्प्यात निवडलेल्या १८६ गावांमध्ये आतापर्यंत चार हजार ६८० कामांपैकी तीन हजार २९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, यावर ८० कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.यामध्ये सिमेंट नाला बांधाची १७३, तर नाला खोलीकरणाच्या ३३३ कामांचा समावेश आहे. तब्बल दहा हजार ९८२ हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यात आली आहे.पावसाचे पाणी शेतातच साचण्यास या कामांचा मोठा उपयोग झाला आहे. दुसºया टप्प्यातील कामांमध्ये ४३ हजार ६२२ इतका पाणीसाठा झाला आहे.पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास यामुळे ८७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.