शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

सुजलाम् सुफलाम्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:48 IST

राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे. दोन वर्षांत ३६१ गावांत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एक लाख, ८७ हजार २७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर विहिरींच्या पाणीपातळीत चार मीटरने वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१५-१६ मध्ये अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये सिमेंट नाला बांधाची ४४२, नाला खोलीकरणाची ५९६ कामे पूर्ण करण्यात आली. तर तीस हजार ४७६ हेक्टरवर बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली.निवडलेल्या गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून १०४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी झालेल्या या कामांना पावसाची चांगली साथ मिळाली. परिणामी विविध जलस्रोतांमध्ये ४९५५० टीसीएम एवढा जलसाठा झाला आहे.या पाण्याचा दोन संरक्षित सिंचनासाठी वापर केल्यास एक लाख ३४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. अभियानाच्या दुसºया टप्प्यात निवडलेल्या १८६ गावांमध्ये आतापर्यंत चार हजार ६८० कामांपैकी तीन हजार २९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, यावर ८० कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.यामध्ये सिमेंट नाला बांधाची १७३, तर नाला खोलीकरणाच्या ३३३ कामांचा समावेश आहे. तब्बल दहा हजार ९८२ हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यात आली आहे.पावसाचे पाणी शेतातच साचण्यास या कामांचा मोठा उपयोग झाला आहे. दुसºया टप्प्यातील कामांमध्ये ४३ हजार ६२२ इतका पाणीसाठा झाला आहे.पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास यामुळे ८७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.