शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सुजलाम् सुफलाम्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:48 IST

राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे. दोन वर्षांत ३६१ गावांत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एक लाख, ८७ हजार २७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर विहिरींच्या पाणीपातळीत चार मीटरने वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१५-१६ मध्ये अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये सिमेंट नाला बांधाची ४४२, नाला खोलीकरणाची ५९६ कामे पूर्ण करण्यात आली. तर तीस हजार ४७६ हेक्टरवर बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली.निवडलेल्या गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून १०४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी झालेल्या या कामांना पावसाची चांगली साथ मिळाली. परिणामी विविध जलस्रोतांमध्ये ४९५५० टीसीएम एवढा जलसाठा झाला आहे.या पाण्याचा दोन संरक्षित सिंचनासाठी वापर केल्यास एक लाख ३४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. अभियानाच्या दुसºया टप्प्यात निवडलेल्या १८६ गावांमध्ये आतापर्यंत चार हजार ६८० कामांपैकी तीन हजार २९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, यावर ८० कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.यामध्ये सिमेंट नाला बांधाची १७३, तर नाला खोलीकरणाच्या ३३३ कामांचा समावेश आहे. तब्बल दहा हजार ९८२ हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यात आली आहे.पावसाचे पाणी शेतातच साचण्यास या कामांचा मोठा उपयोग झाला आहे. दुसºया टप्प्यातील कामांमध्ये ४३ हजार ६२२ इतका पाणीसाठा झाला आहे.पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास यामुळे ८७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.