शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

धक्कादायक ! लग्नाच्या चार दिवस अगोदरच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:14 IST

जळगाव जिल्ह्यातील गावी २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थितीत होणार होता विवाह

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट 

औरंगाबाद : लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी मित्रनगर येथे घडली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

स्रेहल दिलीप चौधरी (२५), असे मृत तरुणीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे स्रेहलचा लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे पाहून २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थित लग्न लावण्याचा निर्णय वधू-वराकडील मंडळीने घेतला  होता. लग्न जळगाव जिल्ह्यातील गावी होणार असल्याने तिचे आई-वडील, लहान बहीण आणि स्रेहल हे गावी जाणार होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता  तिचे वडील एमआयडीसीमध्ये  कामावर गेले होते. यानंतर ८ वाजेच्या सुमारास स्रेहल झोपेतून उठली तेव्हा  तिची आई स्वच्छतागृहात गेली होती. लहान बहीण झोपलेली होती. 

यावेळी स्रेहल स्वयंपाक घरात गेली आणि आतून दार लावून घेतले. स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर तिच्या आईने घरातील इतर कामे केली. बराच वेळ झाला तरी स्रेहल किचनमधून बाहेर न आल्याने त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्रेहलच्या लहान बहिणीला झोपेतून उठवले. घरमालकांना बोलावण्यात आले. सर्वांनी दार ठोठावल्यानंतरही स्रेहलने दार उघडले नाही. यामुळे तिच्या वडिलांना आणि जवाहरनगर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता स्रेहलने ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले.  यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली.

स्रेहल होती औषध निर्माणशास्त्रात पदवीधर स्रेहल बालपणापासूनच हुशार होती. औषधनिर्माणशास्त्रात तिने (बी. फार्मसी) पदवी प्राप्त केली होती. शिवाय ती नोकरीच्या शोधात होती. कदाचित तिला हे लग्न मान्य नसावे यामुळेच तिने मृत्यूला कवटाळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.