शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धक्कादायक ! लग्नाच्या चार दिवस अगोदरच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:14 IST

जळगाव जिल्ह्यातील गावी २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थितीत होणार होता विवाह

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट 

औरंगाबाद : लग्न अवघ्या चार दिवसांवर आलेले असताना तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी मित्रनगर येथे घडली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

स्रेहल दिलीप चौधरी (२५), असे मृत तरुणीचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे स्रेहलचा लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे पाहून २९ जून रोजी ५० लोकांच्या उपस्थित लग्न लावण्याचा निर्णय वधू-वराकडील मंडळीने घेतला  होता. लग्न जळगाव जिल्ह्यातील गावी होणार असल्याने तिचे आई-वडील, लहान बहीण आणि स्रेहल हे गावी जाणार होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता  तिचे वडील एमआयडीसीमध्ये  कामावर गेले होते. यानंतर ८ वाजेच्या सुमारास स्रेहल झोपेतून उठली तेव्हा  तिची आई स्वच्छतागृहात गेली होती. लहान बहीण झोपलेली होती. 

यावेळी स्रेहल स्वयंपाक घरात गेली आणि आतून दार लावून घेतले. स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर तिच्या आईने घरातील इतर कामे केली. बराच वेळ झाला तरी स्रेहल किचनमधून बाहेर न आल्याने त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्रेहलच्या लहान बहिणीला झोपेतून उठवले. घरमालकांना बोलावण्यात आले. सर्वांनी दार ठोठावल्यानंतरही स्रेहलने दार उघडले नाही. यामुळे तिच्या वडिलांना आणि जवाहरनगर पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी दार तोडून पाहिले असता स्रेहलने ओढणीने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले.  यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याविषयी जवाहरनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली.

स्रेहल होती औषध निर्माणशास्त्रात पदवीधर स्रेहल बालपणापासूनच हुशार होती. औषधनिर्माणशास्त्रात तिने (बी. फार्मसी) पदवी प्राप्त केली होती. शिवाय ती नोकरीच्या शोधात होती. कदाचित तिला हे लग्न मान्य नसावे यामुळेच तिने मृत्यूला कवटाळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.