शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आत्महत्या अडकल्या निकषात

By admin | Updated: May 28, 2014 00:42 IST

शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़

 शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ परंतू शासनाच्या आत्महत्याग्रस्तांच्या बाबतीत असलेल्या जाचक नियमांमुळे केवळ १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६६ हजार २९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले़ त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल या ३ महिन्यात जिल्ह्यातील २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ शासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी-५, फेब्रुवारी - ५, मार्च-१२, एप्रिल-५, मे-४ अशा एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात अनुदानासाठी फक्त १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून ९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तर चौकशीसाठी ९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत़ पात्र ठरलेल्या १३ शेतकर्‍यांच्या कुटुंंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे़ आत्महत्येच्या संदर्भात मदतीसाठी शासनाच्या असलेल्या जाचक नियमामुळे पीडित कुटुंबे अक्षरक्ष मेटाकुटीला येत आहेत़ कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने अगोदरच दुखात असलेल्या त्यांच्या आप्तांना शासकीय मदतीसाठीही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात़ त्यासाठी कागदपत्रांची जुळवणी करताना त्यांची आर्थिक पिळवणुकही करण्यात येत असल्याची उदारहणे समोर येत आहेत़ प्रत्यक्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळाली नाही़ असे असताना कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबियांना तरी, मदतीचा आधार देवून सांत्वन करण्याची गरज आहे़ याकडे प्रशासन तसेच समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर मदतीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करताना नातेवाईकांच्या मात्र नाकीनऊ येतात़ बँकेकडून थकित कर्जाचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते़ लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील ४२ वर्षीय संतुका कामाजी गारुळे या शेतकर्‍यांनी १३ मार्च रोजी आत्महत्या केली होती़ ५ एकर मध्ये गहू, हरभरा आवला होता़ बियानांसाठी बँकेचे ९० हजारांचे कर्जही काढले होते़ गारुळे यांच्या आत्महत्येनंतर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही़ त्यामुळे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया रेखाबाई गारुळे यांनी दिली़