शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या अडकल्या निकषात

By admin | Updated: May 28, 2014 00:42 IST

शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़

 शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ परंतू शासनाच्या आत्महत्याग्रस्तांच्या बाबतीत असलेल्या जाचक नियमांमुळे केवळ १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६६ हजार २९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले़ त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल या ३ महिन्यात जिल्ह्यातील २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले़ शासनाच्या आकडेवारीनुसार जानेवारी-५, फेब्रुवारी - ५, मार्च-१२, एप्रिल-५, मे-४ अशा एकूण ३१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यात अनुदानासाठी फक्त १३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरल्या असून ९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तर चौकशीसाठी ९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत़ पात्र ठरलेल्या १३ शेतकर्‍यांच्या कुटुंंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे़ आत्महत्येच्या संदर्भात मदतीसाठी शासनाच्या असलेल्या जाचक नियमामुळे पीडित कुटुंबे अक्षरक्ष मेटाकुटीला येत आहेत़ कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने अगोदरच दुखात असलेल्या त्यांच्या आप्तांना शासकीय मदतीसाठीही कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात़ त्यासाठी कागदपत्रांची जुळवणी करताना त्यांची आर्थिक पिळवणुकही करण्यात येत असल्याची उदारहणे समोर येत आहेत़ प्रत्यक्षात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळाली नाही़ असे असताना कर्ता पुरुष गेलेल्या कुटुंबियांना तरी, मदतीचा आधार देवून सांत्वन करण्याची गरज आहे़ याकडे प्रशासन तसेच समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़ एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर मदतीसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करताना नातेवाईकांच्या मात्र नाकीनऊ येतात़ बँकेकडून थकित कर्जाचे प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते़ लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील ४२ वर्षीय संतुका कामाजी गारुळे या शेतकर्‍यांनी १३ मार्च रोजी आत्महत्या केली होती़ ५ एकर मध्ये गहू, हरभरा आवला होता़ बियानांसाठी बँकेचे ९० हजारांचे कर्जही काढले होते़ गारुळे यांच्या आत्महत्येनंतर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही़ त्यामुळे रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत असल्याची प्रतिक्रिया रेखाबाई गारुळे यांनी दिली़