शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

आत्महत्यांचे सत्र थांबेना

By admin | Updated: April 28, 2016 23:48 IST

औरंगाबाद : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

औरंगाबाद : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ३३८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून तेथे ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. निसर्र्गाच्या लहरीपणामुळे वाया गेलेली पिके, बँकेकडून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून खते, बियाणांमध्ये गुंतविलेले भांडवल वाया गेले.मुलांचे शिक्षण, लग्न अशा विवंचनेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी ११२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी चार महिन्यांतच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३३८ वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वाधिक ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १२९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११७ प्रकरणांत अजून मदत देण्याचा काहीही निर्णय झालेला नाही. ७५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.