शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नवविवाहित शेतमजूर महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:47 IST

लग्नास अवघे पाच महिने झाले होते

वैजापुर  : तालुक्यातील भायगाव येथील एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली. मृत नवविवाहित महिलेचे नाव माया सागर मोरे असे आहे. त्यांच्या लग्नाला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.आत्महत्याचे कारण अजुन स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मायाचे एप्रिल महिन्यात तालुक्यातील भायगाव येथील सागर मोरे सोबत लग्न झाले होते.मायाचे माहेर चाळीसगाव असून बुधवारी माया नेहमी प्रमाणे गावातील एका शेतात मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी रोजदारीसाठी गेली होती. सायंकाळी माया घरी परत न आल्याने तिचा रात्री शोध घेण्यात आले.मात्र ती आढळून आली नाही. यानंतर गुरुवारी सकाळी गावातील छगन एकनाथ आंबोरे यांच्या विहिरी जवळ मायाची चप्पल दिसून आली त्यावेळी विहिरित बघितले असता माया पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्यामुळे घटनेची माहिती  वैजापुर पोलिसांना देण्यात आली. सपोनी पाटिल, बिट जमादार मोईस बेग, गुणवंत थोरात, लक्ष्मण गवळी या पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने दुपारी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.या घटनेची नोंद वेजापुर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक मोइस बेग करत आहे.